शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

त्रिगुणी लस हद्दपार

By admin | Updated: April 24, 2016 00:16 IST

औरंगाबाद : देशभरात १९९५ पासून दरवर्षी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. मात्र, अद्यापही पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही.

औरंगाबाद : देशभरात १९९५ पासून दरवर्षी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येते. मात्र, अद्यापही पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. दरम्यान, आजपर्यंत पोलिओ निर्मूलनासाठी वापरात असलेली त्रिगुणी लस घातक असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने दिल्यामुळे शासनाने ही लस आता कायमची हद्दपार केली असून, २५ एप्रिलपासून यासाठी अत्यंत प्रभावी अशी द्विगुणी लस वापरात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पोलिओची नवीन लस उपलब्ध झाली असून, ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांसाठी इंजेक्शनाद्वारे दिली जाणारी ३५०० लस, बाळांना पाजण्यासाठी २०,००० लस रवाना करण्यात आल्या आहेत. ज्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाचा दिवस असेल, तेथे नवजात बालकाला (पहिल्यांदाच लसीकरणाचा लाभार्थी बालक) ‘आयपीव्ही’ (इनअ‍ॅक्टिव्ह पोलिओ व्हायरस व्हॅक्सीन) ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे दिली जाणारी ही लस अत्यंत प्रभावी, सुरक्षित व परिणामकारक असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालकांना या लसीचा लाभ देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.यंदा ती १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आली. त्रिगुणी पोलिओ लसीकरणाची ती मोहीम अखेरची होती. पोलिओच्या त्रिगुणी लसीमध्ये प्रामुख्याने पी-१, पी-२ आणि पी-३ हे रोग प्रतिबंधात्मक तीन घटक होते. त्यापैकी लसीतील ‘पी-२’ हा घटक पोलिओ होण्यास कारणीभूत ठरल्याचा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय प्रयोगशाळेने दिला होता. आता उपलब्ध असलेली नवीन लस शंभर टक्के परिणामकारक असल्याचा दावा डॉ. खतगावकर यांनी केला आहे.