शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हवेत रायफलींच्या फैरी झाडून श्रद्धांजली

By admin | Updated: October 1, 2016 01:16 IST

किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली़

किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी ८ रायफलींच्या हवेत तीनदा फैरी झाडण्यात आल्या़ गावातील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली़३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. यात १० हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले़ या घटनेची आठवण झाली की आजही अंगावर शहारे येतात. शुक्रवारी जुने किल्लारी गावातील स्मृतिस्तंभास तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी सरपंच युवराज गायकवाड, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, सपोनि़ डी़ बी़ वाघमोडे, प्रा़ डॉ़ संजय मोरे, प्राचार्य कापसे, डॉ़ अशोक पोतदार, मंडळ अधिकारी टी़ जे़ यादव, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष शरद भोसले, तलाठी व्यंकट पवार, प्रकाश पाटील, गणेश शिंदे, सहा़ कृषी अधिकारी कसबे, गणेश माने, ग्रामविकास अधिकारी आदमाने, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव पाटील, तलाठी विजय उस्तुरे, किशोर भोसले, हारुण अत्तार आदी उपस्थित होते़ यावेळी आठ रायफलींच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़ या बिगुल पथकात पोहेकॉ़ माने यांच्यासह १० पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ भूकंपाची ही घटना वेदनादायी असल्याने गावात हा दिवस काळ दिन म्हणून पाळला जातो़