शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाहन धुण्याच्या पाण्यातून फुलविली झाडे

By admin | Updated: June 1, 2016 00:11 IST

औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत

औरंगाबाद : सर्व्हिसिंगसाठी येणारी वाहने धुतल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यातून साताऱ्यातील गॅरेज चालकाने अनेक झाडे फुलविली आहेत. ग्राहक, परिसरातील मुलांमध्ये पाणी बचतीसाठी जागृती करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे.साताऱ्यातील रेणुकामाता मंदिराजवळ सय्यद याकूब यांचे घर आणि गॅरेज आहे. २००९ या वर्षापासून ते साताऱ्यात वास्तव्यास आहेत. शिक्षण कमी झाले असले, तरी त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. काम करताना मिळणाऱ्या फावल्या वेळेत त्यांचे वाचन सुरू असते. ‘झाडाचे एक पान माणसाला ४० दिवस जिवंत ठेवण्याएवढ्या आॅक्सिजनचा पुरवठा करते,’असे याकूब यांच्या वाचनात आले होते. त्याच वेळी त्यांनी वृक्षारोपणात स्वत:ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. झाडे लावणे सोपे असते, परंतु जगवून त्यांचे संवर्धन करणे ही कठीण गोष्ट असते. झाडे जगविण्यासाठी पाणी हे हवेच. साताऱ्यात तीव्र पाणीटंचाई असताना झाडांसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तरही अर्थात याकूब यांना मिळाले. घरातील सांडपाणी शेजारच्या नालीत सोडले जात होते. ग्राहकांची वाहने धुतल्यानंतर पाणी रस्त्यावर येऊ नये, यासाठी नालीतच त्याची विल्हेवाट लावली जात होती. पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.