शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड करण्यात कागदोपत्री वृक्षलागवडीचा फार्स

By admin | Updated: July 15, 2016 00:53 IST

आशपाक पठाण/ बाळासाहेब जाधव/ सितम सोनवणे लातूर जिल्ह्यात ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे असलेले उद्दिष्ट एकाच दिवशी पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचा खोटारडेपणा

आशपाक पठाण/ बाळासाहेब जाधव/ सितम सोनवणेलातूर जिल्ह्यात ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे असलेले उद्दिष्ट एकाच दिवशी पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाचा खोटारडेपणा ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे़ लातूर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत पण त्यात झाड नाही़ काही ठिकाणी जिथे जुने झाड आहे, त्याच्याच बाजूला झाड लावल्याची निशाणी करण्यात आली आहे़ लावलेले झाड दुसऱ्याच दिवशी जनावरे आणि शेळयामेंढ्यांनी खाऊन टाकल्याचे चित्रही काही भागात दिसून आले़ विशेष म्हणजे ग्रामीण भागात अनेक गावात नुसतीच कागदोपत्री नोंद करून उद्दिष्टपूर्तीचा आव आणण्यात आला आहे़ सामाजिक वनिकरण विभागाने राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते़ त्यात लातूर जिल्ह्यासाठी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले़ १ जुलै रोजी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विकास अधिकारी, लघु पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पशुवैद्यकीय विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, निम्न तेरणा कालवा विभाग क्रमांक २, लातूर पाटबंधारे विभाग १, २, लघु सिंचन जलसंधारण विभाग, महसूल, सामाजिक वनिकरण, वन विभाग पोलिस अधीक्षक, क्रीडा अधिकारी, आरटीओ, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, एमआयडीसी, जिल्हा शैल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम लातूर, शासकीय महिला तंत्रनिकेतन, महानगरपालिका, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, देवणी जळकोट, चाकूर, शिरूर अनंतपाळ, जिल्हा कारागृह, जिल्हा न्यायालय, महावितरण, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यासह ४५ विभाग व संस्थांना हे उद्दिष्ट देण्यात आले होते़ यातील सर्वच विभागांनी वृक्षलागवड पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला खरा़ पण घाईघाईत लावलेले रोपटे दोन दिवसात कोठे गायब झाली हे सांगणेही आता संबंधित अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे़ ‘लोकमत’ चमूने लातूर शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची पाहणी केली असता अनेक ठिकाणचे खड्डे रिकामेच असल्याचे आढळून आले़ त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्रतिनिधींनीही वृक्ष लागवडीची पाहणी केली असता त्यांनाही हीच अवस्था दिसून आली आहे़ काही ठिकाणी वृक्ष लागवड झाली़ पण ती दुसऱ्याच दिवशी झाडे गायब झाली़ तर काही ठिकाणी वाळून गेली आहेत़ केवळ शासनाचा रेटा होता म्हणून अधिकाऱ्यांनी मोहीम राबविली़ मात्र लावलेले वृक्ष जगवायचे कसे याचे नियोजनच करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे पंधरा दिवसातच या मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले आहे़ आता रिकाम्या खड्ड्यात वृक्ष लागवड होणार की खड्ड्यांचा खर्च पाण्यात जाणार हे मात्र न उलगडणारे कोडे आहे़