शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

एसटीने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलंय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली आणि अखेर एसटीचा प्रवास करण्यास ब्रेक देण्यात आला. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर जवळच्या ...

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली आणि अखेर एसटीचा प्रवास करण्यास ब्रेक देण्यात आला. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर जवळच्या जिल्ह्यात एसटीचा प्रवास सुरू करण्यात आला. त्यात सॅनिटायझर आणि मास्कचा वापर सर्रास केला जात आहे. कारण कोरोनामुळे खबरदारीची उपाययोजना प्रवासी स्वत:देखील घेत आहेत.

जिल्ह्यात एकूण ५५० बसेस असून, १२१३ चालक आहेत. वाहक संख्या ९३१ असून, एकूण कर्मचारी संख्या २९०० आहे. सध्या कोरोनाचा फटका बसत असल्याने २५६ चालक आणि १७७ वाहक कार्यरत आहेत. एकूण ५५३ कर्मचारी आहेत, अशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानकाची आहे. एकूण दीड महिन्यात २३ कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. सध्या जवळच्या जिल्ह्यात एसटी सेवा सुरू झालेली आहे. तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एसटीचे तिकीट काढून जेमतेम प्रवासीच जाताना दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरचा वापर करण्यावरदेखील भर दिलेला आहे. एसटीमध्ये प्रवाशांना मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

जालना मार्गावरच अधिक बससेवा चालताना दिसत आहे. सध्या खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी हे गावाला जाताना दिसत आहेत. कोरोनामुळे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाईन प्रवासास परवानगीशिवाय जाता येत नव्हते. जिल्हा बंदी करण्यात आली होती. परंतु दीड महिन्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झालेली आहे.

बस सुरू झाली अन्‌ जिवात जीव आला...

- कोरोना काळात अनेक चालकांना बाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कामावर येणे बंद झाले होते. ते बरे झाल्याने पुन्हा प्रवाशांची ने-आण सुरू केली आहे.

- चालक, एसटी

- वाहकांची कोरोनामुळे अवस्था वाईट बनलेली होती. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे एसटीतील जेमतेम वाहकांनाही ठरल्याप्रमाणे घरीच थांबावे लागले. अखेर दीड महिन्यानंतर एसटी सुरू झाल्याने कुटुंबांच्या जिवात जीव आला आहे.

- वाहक, एसटी

मास्कशिवाय प्रवेश नाही...

एसटीत प्रवास करण्यासाठी प्रवासी स्वत:हूनच मास्क लावून येतात, कारण मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. सॅनिटायझरचा देखील उपयोग केला जातो.

अनेक प्रवासी घरातच...

लॉकडाऊनचे अनलॉक केल्याची घोषणा झाली आणि पुन्हा जैसे थे असल्याचे समजल्याने अनेक प्रवासी घरातच बसून आहेत. कोरोना संक्रमणात आपण जायला नको, असाही निर्णय घेतला आहे.

२३ कोटींचे नुकसान..

एसटीला दीड महिन्याच्या काळात एकूण २३ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. कारण प्रवासी संख्याच रोडावली आणि एसटीचा प्रवास बंद केल्याचा परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात एकूण बसेस : ५५०

एकूण चालक : १२१३

सध्या चालक : २५६

एकूण वाहक - ९३१

सध्या वाहक - १७७

एकूण कर्मचारी - ६२२२

सध्या कर्मचारी - ५५३

(डमी स्टार ७७५ )