शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणापासून आरेखक वंचितच !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

संजय तिपाले , बीड अनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही.

संजय तिपाले , बीडअनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे आरेखकांच्या कुशलतेला वावच मिळाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.अनुरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात समावेश करण्याचा शासानादेश आला; पण बीडमध्ये अजूनही काही कर्मचारी अनुरेखक पदावरच कार्यरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त नसल्याने त्यांचा या संवर्गातील समावेश रखडला आहे. दरम्यान, अनुरेखक पद गोठल्यानंतर आरेखक व कनिष्ठ आरेखक यांना बदलत्या काळानुसार तांत्रिक प्रशिक्षण देणे गरजेचे होते. शिवाय त्यांना अद्यावत उपकरणेही उपलब्ध करणे आवश्यक होते.शासनाने त्यांना प्रशिक्षण तर दूरच; पण उपकरणे देखील दिली नाहीत. उपकरणांसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने तोकड्या साहित्यावरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना त्यांची कुशलता व क्षमता विकसित करण्याची संधीच मिळाली नाही.कामाचा बोजा !आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘जॉबचार्ट’ प्रमाणे ३१ प्रकारची कामे करावी लागतात. नकाशाचा पुरवठा, गोपनीय पत्रव्यवहार, वार्षिक अहवाल, रस्त्यांची नोंद निर्देशिका, पुलांची नोंद निर्देशिका, इमारतींची नोंद निर्देशिका, तपासणी टिपणी, रस्त्यांचे स्थानदर्शक नकाशे, नकाशे अद्यावत करणे, खडीचे दरपत्रक ठेवणे, मान्सूनपूर्व तसेच मान्सूननंतर तपासणी बांधकाम नोंदी निर्देशिका अद्यावत ठेवणे, रोडचार्ट अ, ब अद्यावत करणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समिती स्तरावर इतर कामेही आरेखकांवर ढकलली जातात. त्यामुळे मूळ कामे प्रलंबित राहतात.प्रशिक्षण महत्त्वाचेराज्य जिल्हा परिषद रेखाचित्र संवर्ग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद एम. एल. यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना यशदाकडून अद्ययावत तांत्रिक प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. संगणक अर्हता, संगणक पुरवठा, उपकरणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. कामात अचूकता व गती आणण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित हवेत असे सांगून आरेखकांना जॉबकार्डप्रमाणेच कामे द्यावीत, इतर कामांचा बोजा नको असेही सय्यद म्हणाले.