शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अभ्यासापेक्षा रेल्वेचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:54 IST

अभ्यासापेक्षा रेल्वे कधी येणार,याचा अधिक ताण येत असल्याचे म्हणत सोमवारी विद्यार्थिनींनी रेल्वेस्टेशन व्यवस्थापकांना घेराव घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने सकाळी महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही आणि रात्री उशिरा घरी पोहोचतो. अभ्यासापेक्षा रेल्वे कधी येणार,याचा अधिक ताण येत असल्याचे म्हणत सोमवारी विद्यार्थिनींनी रेल्वेस्टेशन व्यवस्थापकांना घेराव घातला.काचीगुडा-मनमाड पॅसेंजर, निजामाबाद-पुणे पॅसेंजर, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस मागील काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. या रेल्वेने लासूर, रोटेगाव, करंजगाव, जालना, परतूर आदी ठिकाणांहून शिक्षणासाठी औरंगाबादला दररोज ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेंना उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना विशेषत: विद्यार्थिनींना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून त्रास होत असल्याने अखेर सोमवारी सायंकाळी विद्यार्थिनींचा संयम सुटला. थेट स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांचे कार्यालय गाठून विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला.सकाळच्या वेळेतील रेल्वे उशिरा धावल्यामुळे महाविद्यालयात उशिराने पोहोचतो. अशावेळी ग्रंथालयात बसावे लागते. घरी गेलो तर घरातील काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे. रेल्वेस्टेशनवरील प्रतीक्षालयात बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे रेल्वेंना उशीर झाल्यानंतर दोन-दोन तास उभे राहावे लागते. रेल्वे उशिरा धावल्याने विद्यार्थिनींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे अंकिता जैस्वाल, पूर्वा शर्मा म्हणाल्या. ए.एस. क्लबमार्गे वाहतूक सुविधांनी जाणे परवडणारे नाही. शिवाय एकट्याने प्रवास करता येत नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या वेळेवर सोडण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी विद्यार्थिनींनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास माहिती दिली जाईल, असे जाखडे म्हणाले. यावेळी किरण खेतरे, मयुरी चव्हाण, लता लोखंडे, गायत्री जैस्वाल, उज्ज्वला सूर्यवंशी, क्षितिजा निकम, प्रीती जैस्वाल, कोमल अधिकार, अमृता लेकुरवाळे, सुषमा देशमुख, मुक्ता देशपांडे आदी विद्यार्थिनींसह रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी आदी उपस्थित होते.