शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वाहतूक कोंडीचा झाला कहर

By admin | Updated: May 29, 2016 00:19 IST

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही.

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे दररोज लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोणताही रस्ता बंद करण्यापूर्वी मनपाने अगोदर पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, मगच काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.चंपाचौक येथे दोन महिन्यांपूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होते. या कामामुळे परिसरातील रस्ता सुमारे १५ दिवस बंद होता. नंतर चंपाचौक ते रोशनगेट या रस्त्यावरील एक बाजू दोन महिने बंद ठेवण्यात आली. मागील आठ दिवसांपासून रोशनगेट ते मदनी चौकाकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद करण्यात आला आहे. बायजीपुरा येथील मुख्य रस्ताही बंद केला आहे. शहा बाजारहून चंपाचौकाकडे येणारा रस्ता चार दिवसांपासून बंद केला. काल रात्री सुरू असलेला रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक बंद होतो. कोणता रस्ता किती दिवस बंद राहणार याची कोणतीही पूर्वसूचना मनपा नागरिकांना देत नाही. एखादा रस्ता बंद केल्यावर त्या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता आहे किंवा नाही, याचा अजिबात विचार करण्यात येत नाही. अचानक रोशनगेट, बायजीपुरा, चंपाचौक आदी भागांतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रोशनगेटकडून मदनी चौकाकडे २४ तासंत ५० ते ६० हजार वाहनधारक ये-जा करतात. मनपाने भूमिगत गटार योजनेसाठी रस्ता बंद केल्याने नागरिकांना बारी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या अरुंद रस्त्यावर दिवसभरातून एक हजार वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. या गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या अरुंद गल्लीच्या तोंडावर काही व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे एक रिक्षाही येथून व्यवस्थित ये-जा करू शकत नाही.चंपाचौक ते रोशनगेट या प्रमुख रस्त्यावर भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने एका बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण सुरू केले आहे. हे काम एवढ्या संथगतीने सुरू आहे की, पावसाळ्यापूर्वी काम संपण्याची कोणतीही शक्यता नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा चार महिने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.