शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

वाहतूक कोंडीचा झाला कहर

By admin | Updated: May 29, 2016 00:19 IST

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही.

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे दररोज लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोणताही रस्ता बंद करण्यापूर्वी मनपाने अगोदर पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, मगच काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.चंपाचौक येथे दोन महिन्यांपूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होते. या कामामुळे परिसरातील रस्ता सुमारे १५ दिवस बंद होता. नंतर चंपाचौक ते रोशनगेट या रस्त्यावरील एक बाजू दोन महिने बंद ठेवण्यात आली. मागील आठ दिवसांपासून रोशनगेट ते मदनी चौकाकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद करण्यात आला आहे. बायजीपुरा येथील मुख्य रस्ताही बंद केला आहे. शहा बाजारहून चंपाचौकाकडे येणारा रस्ता चार दिवसांपासून बंद केला. काल रात्री सुरू असलेला रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक बंद होतो. कोणता रस्ता किती दिवस बंद राहणार याची कोणतीही पूर्वसूचना मनपा नागरिकांना देत नाही. एखादा रस्ता बंद केल्यावर त्या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता आहे किंवा नाही, याचा अजिबात विचार करण्यात येत नाही. अचानक रोशनगेट, बायजीपुरा, चंपाचौक आदी भागांतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रोशनगेटकडून मदनी चौकाकडे २४ तासंत ५० ते ६० हजार वाहनधारक ये-जा करतात. मनपाने भूमिगत गटार योजनेसाठी रस्ता बंद केल्याने नागरिकांना बारी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या अरुंद रस्त्यावर दिवसभरातून एक हजार वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. या गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या अरुंद गल्लीच्या तोंडावर काही व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे एक रिक्षाही येथून व्यवस्थित ये-जा करू शकत नाही.चंपाचौक ते रोशनगेट या प्रमुख रस्त्यावर भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने एका बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण सुरू केले आहे. हे काम एवढ्या संथगतीने सुरू आहे की, पावसाळ्यापूर्वी काम संपण्याची कोणतीही शक्यता नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा चार महिने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.