शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वाहतुकीला शिस्त लागता लागेना...!

By admin | Updated: June 29, 2014 01:05 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील तिरंगा चौक, महावीर चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, एफडीसी चौक, आंबेडकर चौक, रांजणगाव फाटा, सिमेन्स चौक, कामगार चौक, बजाजगेट, गरवारेगेट आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावून सर्रास राँग साईडने ये-जा करतात. त्यामुळे या चौकात छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो.औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात उद्योजक, कामगार, व्यावसायिक तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळविक्रेते, हॉटेल, टपरीचालक, पाणी-पुरीवाले व अवैध वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळी आदी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोरे चौक, महाराणा प्रताप चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी थांबत नसल्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. दुचाकीस्वार तसेच वाहनचालक राँग साईड तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे अपघात वाढले आहेत. सकाळी कंपनीत जाताना उद्योजक, कामगारांना व शहरातून कामगारांची ने-आण करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कामगार कंपनीत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे शिफ्ट विलंबाने सुरू होते व त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. सायंकाळी घरी परतणारे उद्योजक, कामगार व वाहनचालकांनाही हाच वाहतूक कोंडीचा त्रास होतो. पंढरपुरातील तिरंगा चौक व कामगार चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या दोन्ही चौकात उड्डाणपुलाची गरज आहे. लवकरच मासिआ संघटनेतर्फे जिल्हा उद्योग मित्रांच्या बैठकीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जाणार आहे.- राहुल मोगले, उद्योजकवाहतूक शाखेचे दुर्लक्षवाळूज औद्योगिक परिसरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे वाहतूक शाखेचे लक्ष नाही. त्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. हा प्रश्न वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोडवावा.- पी. के. गायकवाड, उद्योजक