शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

वाहतुकीला शिस्त लागता लागेना...!

By admin | Updated: June 29, 2014 01:05 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील तिरंगा चौक, महावीर चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, एफडीसी चौक, आंबेडकर चौक, रांजणगाव फाटा, सिमेन्स चौक, कामगार चौक, बजाजगेट, गरवारेगेट आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावून सर्रास राँग साईडने ये-जा करतात. त्यामुळे या चौकात छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो.औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात उद्योजक, कामगार, व्यावसायिक तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळविक्रेते, हॉटेल, टपरीचालक, पाणी-पुरीवाले व अवैध वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळी आदी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोरे चौक, महाराणा प्रताप चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी थांबत नसल्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. दुचाकीस्वार तसेच वाहनचालक राँग साईड तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे अपघात वाढले आहेत. सकाळी कंपनीत जाताना उद्योजक, कामगारांना व शहरातून कामगारांची ने-आण करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कामगार कंपनीत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे शिफ्ट विलंबाने सुरू होते व त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. सायंकाळी घरी परतणारे उद्योजक, कामगार व वाहनचालकांनाही हाच वाहतूक कोंडीचा त्रास होतो. पंढरपुरातील तिरंगा चौक व कामगार चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या दोन्ही चौकात उड्डाणपुलाची गरज आहे. लवकरच मासिआ संघटनेतर्फे जिल्हा उद्योग मित्रांच्या बैठकीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जाणार आहे.- राहुल मोगले, उद्योजकवाहतूक शाखेचे दुर्लक्षवाळूज औद्योगिक परिसरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे वाहतूक शाखेचे लक्ष नाही. त्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. हा प्रश्न वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोडवावा.- पी. के. गायकवाड, उद्योजक