शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अवैध वाहतूकदारांची धरपकड

By admin | Updated: July 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दिवसभर आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. यामध्ये पथकांनी अनेक भरधाव वाहनांचा पाठलाग करून कारवाई केली. त्यामुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अशा वाहनांमधून प्रवास करणे प्रवाशांनाही महागात पडले.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळल्याची घटना २० जुलै रोजी पाथ्रीजवळ घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात २१ रोजी पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली. आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई करून अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. यामध्ये जीप, ट्रॅक्ससह मालवाहू वाहनांचा समावेश होता. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईची कल्पना असल्याने अनेकांनी वाहन रस्त्यावर आणले नाही. त्यामुळे या कारवाईमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाक णाऱ्या अवैध वाहतूकदारांवर चाप बसत आहे.