शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतूकदारांची धरपकड

By admin | Updated: July 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दिवसभर आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. यामध्ये पथकांनी अनेक भरधाव वाहनांचा पाठलाग करून कारवाई केली. त्यामुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अशा वाहनांमधून प्रवास करणे प्रवाशांनाही महागात पडले.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळल्याची घटना २० जुलै रोजी पाथ्रीजवळ घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात २१ रोजी पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली. आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई करून अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. यामध्ये जीप, ट्रॅक्ससह मालवाहू वाहनांचा समावेश होता. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईची कल्पना असल्याने अनेकांनी वाहन रस्त्यावर आणले नाही. त्यामुळे या कारवाईमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाक णाऱ्या अवैध वाहतूकदारांवर चाप बसत आहे.