शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे.

बीड: शहरातील अति रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी पार्किंग करत असल्याने वाहनकोंडी होत आहे. यामध्ये सुभाष मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच दुचाकी लावत असल्याने वाहनकोंडी होत असून रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.अति रहदारीच्या मार्गावर तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत, असा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बहुतांश शाळा व महाविद्यालय आहेत. त्यातच विविध वस्तूंची दुकाने देखील शहरातील सुभाष मार्गावर आहेत. याचाच परिणाम भाजी मंडई व सुभाष रोड या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. परंतु खरेदीसाठी आलेल्यांनी वाहने पार्किंग करताना रस्त्याच्या बाजूला अंतर ठेवून करण्याचे ना संबंधित दुकानदार सांगतो, ना वाहतूक पोलिस सांगतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अपघात देखील होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाजी मंडईत विद्यार्थी, पालकांची कोंडीशहरातील भाजी मंडई भागात रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे, भाजी विक्रेते बसलेले असल्याने अरूंद रस्त्यावरूनच दुचाकी व तीन चाकी वाहने ये-जा करतात. मात्र अनेकवेळी चार चाकी वाहने भाजी मंडईतून जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांना घ्यायला आलेल्या पालकांना देखील सहन करावा लागत आहे. याबाबत शहर वाहतूक विभागाचे प्रमुख एम.ए. सय्यद यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शहरातील सुभाष रोडवरील दुकानदारांना नोटिसा देऊन दुकानासमोरील पार्किंग हटविण्याचे सांगितले आहे. तसेच सुभाष रोड, भाजी मंडई भागात पार्किंग व्यवस्था करावी, याबाबत बीड न.प.ला अनेकवेळा पत्र दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.