बीड : सध्या शेती मशागतीचे कामे जोमात सुरू आहेत. यंत्राच्या माध्यमातूनच अधिक प्रमाणात मशागतीचे कामे केली जात आहेत. यामुळे जमिनीचा कस खलावत आहेत. यंत्राच्या सहाय्याने रात्रीच्या वेळीच नांगरण, मोगडन, कुळपनी केल्यास मशागतीचा हेतूच साध्य होत नाही. त्यामुळे दिवसा बैलजोडीच्या सहाय्यानेच केलेली मशागत उत्पादनासाठी लाभदायक ठरणार आहे. हिवाळ्यात आणि उन्हाळी हंगामात सर्रास शेतकरी जमिनीची मशागत करतात. बदलत्या काळाच्या ओघात शेतकरीही आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेतीची मशागत करीत आहे. कमी वेळेत अधिकच्या क्षेत्राची मशागत होत असली तरी ही मशागत पद्धती पिकाच्या दृष्टीेने धोकादायक ठरत आहे. ट्रक्टरसारख्या यंत्राच्या सहाय्याने रात्रीच्या वेळ शेतीची मशागत केली जाते. मशागतीच्या वेळी नांगरटीच्या जमिनीतील आळ्या, किटकनाशके यावर पक्षी मारा करतात त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत मिळते. रात्रीच्या वेळ पक्ष्यांची रेलचेल अत्यंल्प प्रमाणात असते. तर पारंपारिक मशागत पद्धतीला बळीराजा सकाळच्या वेळीच सुरवात करीत असत त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी पक्ष्यांचा अधिक प्रमाणात वावर असतो. जिल्ह्यात खरीप हंगामात ६० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. त्यामुळे या प्रमुख पिकांच्या लागवडीपुर्वी नांगरण ही केलीच जाते. (प्रतिनिधी)
पारंपरिक शेतीमशागत झाली दुर्मिळ
By admin | Updated: May 10, 2015 00:20 IST