शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांमुळे व्यवसाय कोलमडण्याची व्यापाऱ्यांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयामुळे व्यापार कोलमडण्याची दाट ...

औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयामुळे व्यापार कोलमडण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत व्यापाऱ्यांनी विविध संकटांचा मुकाबला केला. आता तिसऱ्या लाटेचे निर्बंध असह्य ठरत आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतात. त्याचवेळी दुकाने बंद करावी लागत आहेत. दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, स्वत:चा घर खर्च, बँकांचे हप्ते, जीएसटी, महापालिकेचा कर भरावा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पहिल्या लाटेत माणुसकीच्या नात्याने काही दुकान मालकांनी भाडे माफ केले. दुसऱ्या लाटेत दुकाने बंद ठेवून भाडे द्यावे लागले. आता तिसऱ्या लाटेत अर्धा दिवसच दुकान सुरू राहील. दिवसा अनेक व्यापाऱ्यांकडे ग्राहकच नसतात. सायंकाळी थोडाफार व्यवसाय होतो. त्याचवेळी दुकाने बंद करावे लागत आहेत. आणखी काही दिवस ही परिस्थिती राहिली तर व्यापारी पूर्णपणे कोलमडून जातील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली जात होती. त्यानंतर ७ जूनला निर्बंध उठविण्यात आले. बाजारपेठ हळूहळू पूर्ववत होत होती. मात्र, आता अवघ्या २१ दिवसांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले.

व्यापारी शासनाकडे दु:ख मांडणार

डेल्टा प्लसचा रुग्ण ज्या भागात सापडेल त्या भागात कडक उपाययोजना कराव्यात. अद्याप शहरात रुग्णच सापडलेला नाही. कोरोना रुग्णसंख्याही बरीच अटोक्यात आहे. व्यापारी नियमांचे पालन करूनच व्यवसाय करीत आहेत. व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले. लवकरच मुख्यमंत्र्यांकडेही दु:ख मांडण्यात येईल. तेथूनच थोडासा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.

हॉटेल उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त

हॉटेलला ग्राहक सायंकाळीच सर्वाधिक येतात. दुपारी जेवणासाठी येणारे ग्राहक अत्यंत कमी असतात. सायंकाळी हॉटेलच बंद म्हणजे कसे शक्य आहे. पार्सल घेण्यासाठी ग्राहक येत नाहीत. नवीन निर्बंध हॉटेल व्यवसायाला बुडविणारे आहेत. अगोदरच दोन लाटांमध्ये हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या खचला आहे. आता तिसऱ्या लाटेत तग धरणे कठीण आहे. हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा व्यवसाय निवडावा लागेल.

किशोर शेट्टी, हॉटेल व्यावसायिक

चार तास थांबलो, पण उपयोग नाही...

गोमटेश मार्केट भागात अनेक वर्षांपासून भेळ विकतो. नवीन नियमानुसार आज १ वाजताच गाडी लावली. ४ वाजेपर्यंत शंभर रुपयांचाही व्यवसाय झाला नाही. भेळ खाणारा ग्राहक दुपारी ४ नंतरच येतो. चार तास गाडी लावून काहीच उपयोग झाला नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास उपासमार होईल. शासनाने याचा कुठे तरी गांभीर्याने विचार करावा.

सुरेश कन्हैयालाल तेली, भेळ विक्रेता.