शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जलपर्णी शोषतात विषारी घटक

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. मात्र, पाण्यातील प्रदूषण रोखण्यात महानगरपालिकेला यश आले नाही; पण हेच काम जलपर्णीने करून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर येथील जैवविविधता जपण्यातही या जलपर्णीचा मोठा वाटा आहे. तरीसुद्धा या सरोवरातील अर्धी जलपर्णी काढून टाकण्यात आली आहे. येथील जलपर्णी कमी झाली, तर जैवविविधताही संकटात येऊ शकते. या पाणवनस्पतीत सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय घटक शोषून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. साल्व्हिनिया, लेम्ना, स्पायरोडेला यांचा वापर सांडपाण्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी केला जातो. या पाणवनस्पतीला वाढवण्यासाठी तसे काही विशेष करावे लागत नाही. तिचा वाढीचा वेग प्रचंड असतो. विषारी रसायने शोषून घेण्याची त्यांची क्षमतासुद्धा प्रचंड असते. या पाणवनस्पतींच्या यादीत इकॉर्निया म्हणजे हायस्निळची गणना होते. सांडपाण्यातील नत्र, फॉस्फरस, सेंद्रिय कार्बन, तरंगणारे घनपदार्थ, फिनॉलसल्प कीटकनाशके, क्लोरिनयुक्त हायड्रोकार्बन, जड धातू या सर्व प्रकारच्या प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता तिच्यात आहे. हे संस्कारित सांडपाणी वाहत्या पाण्यात किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर सोडून त्याची विल्हेवाट लावता येते. जलपर्णीइतकी विषारी घटक शोषून घेण्याची क्षमता दुसर्‍या कोणत्याही वनस्पतीत नाही. हेच या जलपर्णीचे बलस्थान आहे. यासंदर्भात पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले की, जलपर्णी फक्त सांडपाण्यावरच येत असते. गोड पाण्यात जलपर्णी कधीच येत नाही. मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने सलीम अली सरोवरातील निम्मी जलपर्णी काढून टाकली. मात्र, या जलपर्णीवरच येथील जैवविविधता टिकून आहे याचे ज्ञानच त्यांना नाही. अजूनही येथे पाणी स्वच्छ दिसावे म्हणून जलपर्णी काढण्याचा विचार मनपा करीत आहे. मात्र, जलपर्णी काढल्यास आसपासच्या परिसरातून येणार्‍या ड्रेनेजच्या पाण्याने सरोवरात दुर्गंधी पसरेल. येथील जैवविविधता नष्ट होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. जलपर्णीवर पर्यावरणशास्त्रात अधिक संशोधन झाले पाहिजे आणि जिथे-जिथे तलाव आहेत तिथे जलपर्णीची संख्या वाढविली पाहिजे. जेणेकरून तलावातील पाणी प्रदूषणमुक्त होईल. ८२ पैकी ५६ प्रकारचे पक्षी देशी सलीम अली सरोवरात ८२ प्रकारचे पक्षी आहेत. त्यात ५६ प्रकारचे देशी तर उर्वरित विदेशी आहेत. विदेशी पक्षी हंगामातच येथे मुक्कामाला येत असतात. जलपर्णीमुळे येथे कीटक, जलचर प्राण्यांचे वास्तव्य असते. तेच या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. जलपर्णीमुळेच आपणास आज येथे जैवविविधता बघावयास मिळत आहे. येथील जलपर्णी काढून टाकली, तर पाणी दूषित होईलच, याशिवाय सरोवरात दुर्गंधीही पसरेल. याचा परिणाम जैवविविधता नष्ट होण्यावरही होऊ शकतो.