शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

जलपर्णी शोषतात विषारी घटक

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. मात्र, पाण्यातील प्रदूषण रोखण्यात महानगरपालिकेला यश आले नाही; पण हेच काम जलपर्णीने करून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर येथील जैवविविधता जपण्यातही या जलपर्णीचा मोठा वाटा आहे. तरीसुद्धा या सरोवरातील अर्धी जलपर्णी काढून टाकण्यात आली आहे. येथील जलपर्णी कमी झाली, तर जैवविविधताही संकटात येऊ शकते. या पाणवनस्पतीत सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय घटक शोषून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. साल्व्हिनिया, लेम्ना, स्पायरोडेला यांचा वापर सांडपाण्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी केला जातो. या पाणवनस्पतीला वाढवण्यासाठी तसे काही विशेष करावे लागत नाही. तिचा वाढीचा वेग प्रचंड असतो. विषारी रसायने शोषून घेण्याची त्यांची क्षमतासुद्धा प्रचंड असते. या पाणवनस्पतींच्या यादीत इकॉर्निया म्हणजे हायस्निळची गणना होते. सांडपाण्यातील नत्र, फॉस्फरस, सेंद्रिय कार्बन, तरंगणारे घनपदार्थ, फिनॉलसल्प कीटकनाशके, क्लोरिनयुक्त हायड्रोकार्बन, जड धातू या सर्व प्रकारच्या प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता तिच्यात आहे. हे संस्कारित सांडपाणी वाहत्या पाण्यात किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर सोडून त्याची विल्हेवाट लावता येते. जलपर्णीइतकी विषारी घटक शोषून घेण्याची क्षमता दुसर्‍या कोणत्याही वनस्पतीत नाही. हेच या जलपर्णीचे बलस्थान आहे. यासंदर्भात पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले की, जलपर्णी फक्त सांडपाण्यावरच येत असते. गोड पाण्यात जलपर्णी कधीच येत नाही. मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने सलीम अली सरोवरातील निम्मी जलपर्णी काढून टाकली. मात्र, या जलपर्णीवरच येथील जैवविविधता टिकून आहे याचे ज्ञानच त्यांना नाही. अजूनही येथे पाणी स्वच्छ दिसावे म्हणून जलपर्णी काढण्याचा विचार मनपा करीत आहे. मात्र, जलपर्णी काढल्यास आसपासच्या परिसरातून येणार्‍या ड्रेनेजच्या पाण्याने सरोवरात दुर्गंधी पसरेल. येथील जैवविविधता नष्ट होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. जलपर्णीवर पर्यावरणशास्त्रात अधिक संशोधन झाले पाहिजे आणि जिथे-जिथे तलाव आहेत तिथे जलपर्णीची संख्या वाढविली पाहिजे. जेणेकरून तलावातील पाणी प्रदूषणमुक्त होईल. ८२ पैकी ५६ प्रकारचे पक्षी देशी सलीम अली सरोवरात ८२ प्रकारचे पक्षी आहेत. त्यात ५६ प्रकारचे देशी तर उर्वरित विदेशी आहेत. विदेशी पक्षी हंगामातच येथे मुक्कामाला येत असतात. जलपर्णीमुळे येथे कीटक, जलचर प्राण्यांचे वास्तव्य असते. तेच या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. जलपर्णीमुळेच आपणास आज येथे जैवविविधता बघावयास मिळत आहे. येथील जलपर्णी काढून टाकली, तर पाणी दूषित होईलच, याशिवाय सरोवरात दुर्गंधीही पसरेल. याचा परिणाम जैवविविधता नष्ट होण्यावरही होऊ शकतो.