शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

वीटभट्ट्यांमुळे विषारी वायूचे उत्सर्जन

By admin | Updated: April 1, 2017 00:12 IST

अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला असून, शेतजमिनीही नापीक होत आहेत. वीट भट्ट्यांमधून होणारे प्रदूषण परिसरातील शेतकऱ्यांसाठी घातक ठरू पाहत आहे.शहरालगत असलेल्या चनई येथे ८० शेतकऱ्यांनी १५० एकरावर तुतीची लागवड केली आहे. या माध्यमातून सहा वर्षांपासून रेशीम उद्योगाची निर्मिती सुरू आहे. बारामाही उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना आता वीटभट्टीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असून, मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडायआॅक्साईड असे विषारी वायंूचे उर्त्सजन होत आहे. याचा परिणाम रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या अळ्या व होणारी कोश निर्मिती यावर होत आहे. येथील शेतकरी प्रशांत पंडीतराव कदम यांचा दोन एकराचा प्लॉट प्रदूषणामुळे निकामी झाला असून विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे आळ्या मरून पडल्या आहेत. यात त्यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. कदम यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांच्या रेशीम उद्योगाला घरघर लागली आहे. सदरील नुकसान पाहणीसाठी औरंगाबाद येथून शास्त्रज्ञांचे पथक आले होते. त्यांनी रेशीम उद्योगाच्या शेडला भेटी दिल्या असत्या ठिकठिकाणी विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे अळ्या मरून पडल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी वैजनाथ भांगे यांनी सांगितले.