शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

वीटभट्ट्यांमुळे विषारी वायूचे उत्सर्जन

By admin | Updated: April 1, 2017 00:12 IST

अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला असून, शेतजमिनीही नापीक होत आहेत. वीट भट्ट्यांमधून होणारे प्रदूषण परिसरातील शेतकऱ्यांसाठी घातक ठरू पाहत आहे.शहरालगत असलेल्या चनई येथे ८० शेतकऱ्यांनी १५० एकरावर तुतीची लागवड केली आहे. या माध्यमातून सहा वर्षांपासून रेशीम उद्योगाची निर्मिती सुरू आहे. बारामाही उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना आता वीटभट्टीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असून, मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडायआॅक्साईड असे विषारी वायंूचे उर्त्सजन होत आहे. याचा परिणाम रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या अळ्या व होणारी कोश निर्मिती यावर होत आहे. येथील शेतकरी प्रशांत पंडीतराव कदम यांचा दोन एकराचा प्लॉट प्रदूषणामुळे निकामी झाला असून विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे आळ्या मरून पडल्या आहेत. यात त्यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. कदम यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांच्या रेशीम उद्योगाला घरघर लागली आहे. सदरील नुकसान पाहणीसाठी औरंगाबाद येथून शास्त्रज्ञांचे पथक आले होते. त्यांनी रेशीम उद्योगाच्या शेडला भेटी दिल्या असत्या ठिकठिकाणी विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे अळ्या मरून पडल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी वैजनाथ भांगे यांनी सांगितले.