शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वीटभट्ट्यांमुळे विषारी वायूचे उत्सर्जन

By admin | Updated: April 1, 2017 00:12 IST

अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला असून, शेतजमिनीही नापीक होत आहेत. वीट भट्ट्यांमधून होणारे प्रदूषण परिसरातील शेतकऱ्यांसाठी घातक ठरू पाहत आहे.शहरालगत असलेल्या चनई येथे ८० शेतकऱ्यांनी १५० एकरावर तुतीची लागवड केली आहे. या माध्यमातून सहा वर्षांपासून रेशीम उद्योगाची निर्मिती सुरू आहे. बारामाही उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना आता वीटभट्टीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असून, मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडायआॅक्साईड असे विषारी वायंूचे उर्त्सजन होत आहे. याचा परिणाम रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या अळ्या व होणारी कोश निर्मिती यावर होत आहे. येथील शेतकरी प्रशांत पंडीतराव कदम यांचा दोन एकराचा प्लॉट प्रदूषणामुळे निकामी झाला असून विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे आळ्या मरून पडल्या आहेत. यात त्यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. कदम यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांच्या रेशीम उद्योगाला घरघर लागली आहे. सदरील नुकसान पाहणीसाठी औरंगाबाद येथून शास्त्रज्ञांचे पथक आले होते. त्यांनी रेशीम उद्योगाच्या शेडला भेटी दिल्या असत्या ठिकठिकाणी विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे अळ्या मरून पडल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी वैजनाथ भांगे यांनी सांगितले.