शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

टाऊनशिप बारगळणार!

By admin | Updated: June 24, 2017 23:46 IST

जालना : शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास विरोध होत असल्याने टाऊनशिप बारगळण्याची चिन्हे आहेत.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जालना व औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र (स्मार्ट टाऊनशिप) विकसित करण्याचे नियोजित आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास विरोध होत असल्याने टाऊनशिप बारगळण्याची चिन्हे आहेत. कुठल्याही महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरी भागालगत झपाट्याने विकास होता. दु्रतगती महामार्गावर जोडणीच्या ठिकाणी होणारा अनियंत्रित विकास टाळण्यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणी सुनियोजित पद्धतीने स्मार्ट टाऊनशिप विकसित करण्यात येणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी व औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा-करमाड, दौलताबाद व वैजापूर येथे टाऊनशिपचे नियोजन आहे. पाचशे हेक्टरवर होणाऱ्या या टाऊनशिपमध्ये कृषी पूरक उद्योग, शीतगृह, गोदाम, महामार्ग पर्यटन केंद्र, फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा केंद्र इ. २१ प्रकारच्या सुविधा असणार आहेत. या महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना लॅण्ड पुलिंग मॉडेलनुसार स्मार्ट टाऊनशिपमध्ये एकूण जमिनीच्या २५ व ३० टक्के विकसित भूखंड व कृषी मालाचा दहा वर्षांपर्यंत वाढीव मोबदला देण्याचे शासनाने निश्चित केले होते. मात्र, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात लॅण्ड पुलिंगला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शिवाय स्मार्ट टाऊनशिपसाठी पाचशे हेक्टर जमीन देण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे येथे स्मार्ट टाऊनशिप होणार का याबाबत अनिश्चितता आहे.