शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

गुन्ह्यापूर्वी जेवणावर ताव; मोबाईल ठेवले ‘स्वीचआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 22:59 IST

बीड रवींद्र मनोहर मदने या तरुणास मारेकऱ्यांनी अतिशय थंड डोक्याने संपविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

संजय तिपाले  बीडरवींद्र मनोहर मदने या तरुणास मारेकऱ्यांनी अतिशय थंड डोक्याने संपविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. हत्येपूर्वी रवींद्रसोबत आष्टीत त्यांनी ढाब्यावर जेवण केले होते. लोकेशन टाळण्यासाठी तिघांनीही स्वत:चे मोबाईल बंद ठेवले. रवींद्रचे प्रेत ईमामपूर रोडवर पुरल्यानंतर या सर्वांनी ‘जीव गेला तरी खरं कधीच सांगायचं नाही’ अशी शपथ घेतली होती. नववी, दहावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या त्रिकुटांनी केलेल्या ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ने पोलीसही हादरून गेले.विशीतील रवींद्रच्या खुनाचा आरोप असलेला दत्तात्रय अशोक जामकर व इतर दोन अल्पवयीन हे सर्व मैंदा (ता.बीड) येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय बीए प्रथम वर्षात तर उर्वरित दोघे अनुक्रमे नववी व दहावीत शिकतात. तिघेही सर्वसाधारण कुटुंबातील असून रवींद्रचे मित्र आहेत. दीड महिन्यापूर्वी जामकरने रवींद्रच्या वडवणी येथील शॉपीतून मोबाईल खरेदी केला होता. मात्र, पैशाच्या देवाण- घेवाणीतून त्यांच्यात वितुष्ट आले. त्यावेळी रवींद्रने जामकरला चापट मारली होती. त्याचा बदला घेण्यासाठी जामकरने त्याच्या खुनाचा कट रचला. अहमदनगरला लग्नाला जाण्याचे निमित्त करुन ९ जानेवारी रोजी रवींद्रची कार क्र. (एमएच २० बीसी- ३२८०) भाड्याने घेतल्यानंतर या तिघांनीही बीड सोडताच आपले मोबाईल स्वीच आॅफ केले. जामखेडजवळ त्यांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर आष्टीनजीक लघुशंकेचा बहाणा करुन जामकरने कार थांबवायला सांगितली. त्याने खाली उतरून स्वत:कडील मिरचीपूड रवींद्रच्या डोळ्यात टाकली. तो वेदनेने विव्हळत असतानाच मागच्या सीटवर बसलेल्या दोघांनी दोरीने त्याचा गळा आवळला. प्रेतासह ते कारमधून बीडला परतले. मास्टर मार्इंड जामकरने स्वत: कार चालवली. पोलिसांना लोकेशन सापडू नये, यासाठी त्या सर्वांनी बीडला पोहोचेपर्यंत मोबाईल सुरु करायचा नाही असे ठरवले. मात्र, जामकरने नवगण राजुरी जवळ येताच आपला मोबाईल सुरु करुन बंद केला. इमामपूर रस्त्यावर रवींद्रच्या प्रेताची त्यांनी विल्हेवाट लावली. त्याच्या मोबाईलमधील सीम काढून कारमध्येच टाकून ते पळाले होते.