शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

शुक्रवारपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली होतील; परंतु पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध असतील, अशी माहिती ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली होतील; परंतु पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून पर्यटनस्थळे बंद आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेली ऐतिहासिक पर्यटनस्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले असले तरी अंतिम निर्णय जिल्हाधिकारी चव्हाण घेणार असल्यामुळे बुधवारपासून पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय झाला नाही.

जिल्ह्यात वेरूळ, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला, खुलताबाद येथील औरंगजेब कबर यासह अनेक पर्यटन वास्तू आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आठ महिने सदरील पर्यटनस्थळे बंद होती. त्यानंतर ती खुली करण्यात आली; परंतु पुन्हा मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे पर्यटनस्थळे बंद करावी लागली. ७ जूनपासून जिल्ह्यात अनलॉकचा निर्णय झाला असला तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्यामुळे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे सुरू करण्याची परवानगी देताना अनेक अटींचे बंधन घालण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार असे दोन हजार पर्यटक पर्यटनस्थळांना भेट देऊ शकतील. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.

दोन दिवसांत निर्णय होणार

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली करण्यात येणार आहेत. परंतु तत्पूर्वी किमान दोन दिवस सर्व पर्यटनस्थळे स्वच्छ करण्यासाठी मुदत द्यावी लागेल. तसेच सर्व पर्यटनस्थळांच्या आवारातील दुकाने, विक्रेत्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. गेल्या लॉकडाऊननंतर दोन हजार पर्यटकांना पर्यटनस्थळ आवारात येण्यासाठी परवानगी दिली होती. तसेच ऑनलाइन नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आले होते. यावेळी किती पर्यटकांना परवानगी द्यायची, त्याचा निर्णय या दोन दिवसांत होईल.