शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पर्यटन राजधानीचा कचरा होऊ नये; पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 18:40 IST

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्‍या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्‍या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

नारेगाव कचराडेपोमध्ये कचरा टाकू देण्यास नकार दिल्यामुळे शहरातील रस्त्यांवरच कचर्‍याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ राहिले बाजूला आणि सर्वत्र कचराच दिसत आहे. औरंगाबाद लेणी, पाणचक्की आणि बीबी का मकबर्‍याचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना कचर्‍यांचे हे ढीग पाहत जावे लागत आहे. पर्यटन राजधानीचे असे हाल पाहून पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश जात असून, कचराकोंडीवर लवकरच तोडगा निघाला नाही, तर पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

कॅनडाहून आलेले पर्यटक अ‍ॅलन यंग यांनी भारताच्या विविध शहरांना भेटी दिलेल्या आहेत. मागच्या दोन दिवसांपासून ते शहरात आहेत. ‘भारत हा फार सुंदर देश आहे. तो अजून सुंदर होऊ शकतो. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक सुविधा अमलात आणण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. यंग यांनी कॅनडात पत्रकारिता केलेली आहे. सध्या ते दुसर्‍यांदा भारत भेटीवर आलेले आहेत. त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले, कचरा व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न असून, त्यामध्ये केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी मुंबई, गोवा, कोची, भोपाळ, हैदराबाद, आग्रा, अहमदाबाद अशा विविध शहरांना भेटी दिलेल्या असून, त्यांच्या तुलनेत औरंगाबाद अधिक स्वच्छ असल्याचे सांगताना घनकचरा व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

अशीच भावना भारतीय पर्यटक आणि गाईड यांनीदेखील बोलून दाखविली. ‘रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचने हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत वाईट चित्र आहे. कचराकोंडी अशीच कायम राहिली, तर पर्यटनस्थळांभोवतीही कचरा साचू लागेल. तेव्हा काय करणार?’ असा सवाल गाईड आणि पर्यटक व्यावसायिकांनी केला. ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून औरंगाबादचा प्रचार केला जातो. तेथेच सर्वत्र कचरा दिसत असेल तर पर्यटकांनी का म्हणून येथे यावे? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

आता कचर्‍याची भर नकोदळणवळणाची असुविधा आणि मार्केटिंग नसल्यामुळे आधीच औरंगाबाद शहरातील पर्यटनाचा हंगाम नऊ महिन्यांऐवजी तीन महिन्यांवर आला आहे. त्यात कचर्‍याची भर पडून हे तीन महिनेदेखील हातचे जायला नकोत.- जसवंत सिंग, पर्यटन व्यावसायिक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका