शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

पर्यटन विकास प्राधिकरणाला ‘सरकारी’ छेद

By admin | Updated: May 6, 2016 23:57 IST

औरंगाबाद : पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन विकास प्राधिकरणाच्या मंजूर आराखड्याला छेद देणारे ‘सरकारी’ पत्र नियोजन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील वेरूळ, खुलताबाद, शूलिभंजन, म्हैसमाळ या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन विकास प्राधिकरणाच्या मंजूर आराखड्याला छेद देणारे ‘सरकारी’ पत्र नियोजन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे. पर्यटन, ग्रामविकास, नगरविकास खात्यांकडून ‘काम व खर्चनिहाय’ आराखडे नियोजन विभागाला पाठवावेत, असे त्या पत्रात नमूद करण्यात आल्याने सरकारनेच सरकारच्या कालपर्यंत मंजूर आराखड्यांना छेद दिला आहे. नियोजन विभागाने पर्यटन विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव परत पाठवून पर्यटन, ग्रामविकास, नगरविकास या विभागांनी खुलताबाद, शूलिभंजन, म्हैसमाळ या तीर्थक्षेत्रांसाठी स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. हा अध्यादेश काढल्यामुळे विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य अर्थसंकल्पात पर्यटन विकास प्राधिकरणासाठी निधी मिळणार असल्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली असतानाच ते पत्र आले. नियोजन विभागाच्या पत्रामध्ये म्हटले आहे की, वेरूळ, खुलताबाद, शूलिभंजन, म्हैसमाळ या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पर्यटन, ग्रामविकास आणि नगरविकास विभागाने स्वतंत्रपणे प्रस्ताव तयार करून पाठवावा, पर्यटन विकास प्राधिकरणाने पाठविलेला प्रस्ताव परत पाठविण्यात येत आहे. हे पत्र घेऊन पर्यटन विकास महामंडळाचे वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांची शुक्रवारी भेट घेतली. विभागीय आयुक्तांनी तातडीने नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.असा आहे आराखडावेरूळ, खुलताबाद, शूलिभंजन आणि म्हैसमाळ पर्यटन प्राधिकरणासाठी पहिल्या टप्प्यातील १४५ कोटींच्या आराखड्यास मागेच मंजुरी देण्यात आली आहे. म्हैसमाळ पर्यटन प्राधिकरणाचा ४३५ कोटी ९२ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता; परंतु रस्त्यासाठी स्वतंत्र निधी खर्च केला जाणार असल्यामुळे या आराखड्यातील रस्ते हा घटक वगळण्यात आला. म्हैसमाळ येथील गिरजादेवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करून सुशोभीकरण आणि पाणी साठविण्याचे नियोजन करण्याच्या कामासाठी २५ कोटी ३८ लाख, वीज वितरण सुविधेसाठी १ कोटी १६ लाख, पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेसाठी २५ कोटी ३० लाख, रस्ते बांधणीसाठी ८९ कोटी ३४ लाख, अशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील १४१ कोटी १९ लाख ३२ हजार रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. येत्या ३ वर्षांत प्राधिकरणामार्फत विकासकामे करण्यासाठी ३ टप्प्यात निधीची तरतूद केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १४५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.