शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तूर वजनात ‘गोलमाल’!

By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST

लातूर :एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़

लातूर : शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने तुरीला ५ हजार ५० रूपये हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करण्याचे आवाहन केले़ मात्र हमीभाव खरेदी केंद्रावर एका कट्ट्याच्या पाठीमागे जवळपास १ किलो २०० ग्रॅम ज्यादा तूर घेऊन शेतकऱ्यांना लुटले़ तर विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशनने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या तुरीच्या एका कट्ट्यात एक किलोची तूट झाल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़जिल्ह्यात नाफेड अंतर्गत आठ हमीभाव खरेदी केंद्र आहेत़ या केंद्रावर आजपर्यंत ११ हजार ८०० शेतकऱ्यांची १ लाख ८० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, १ हजार शेतकऱ्यांना ७४ कोटी रूपये देण्यात आले आहेत़ १५ कोटी रूपये थकीत आहेत़ तसेच लातुरात विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशन मार्फत पाच हजार शेतकऱ्यांची ९६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ खरेदी केलेली तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आली़ नाफेड अंतर्गतच्या केंद्रांनी बारदाण्यासह ५० किलो ६०० ग्रॅम तूर खरेदी करणे अपेक्षित असताना या केंद्रावर ५१ किलो २०० ग्रॅमपर्यंत तूर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक लक्ष्मण वंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती़ (अधिक वृत्त हॅलो/२वर)