शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

तूर डाळीचे कट्टे रेशन दुकानांवरच पडून!

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही.

औरंगाबाद : व्यापाऱ्यांनी तूर डाळीचा भाव कमी केल्यामुळे त्याचा फटका रेशनवरील तूर डाळीस बसत असून या डाळीला उठावच नाही. त्यामुळे रेशन दुकानावर तूर डाळीचे कट्टे जसेच्या तसे पडून आहेत. रेशन दुकानावर तूर डाळ उपलब्ध करून देताच व्यापाऱ्यांनी ८० ते १०० रु. प्रतिकिलो दराने विक्री सुरूकेली. त्यामुळे रेशनवरील १०३ रु. किलो दराने मिळणारी डाळ खरेदी करण्यास रेशन कार्डधारक तयार नाहीत. तूर डाळीचे भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे सरकारने खुल्या बाजारात सुरुवातीला १२० रु. किलो दराने ही डाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. सरकार बाजारात तूर डाळ आणणार असल्याचे समजताच व्यापाऱ्यांनी त्यांचा नफा कमी केला. हळूहळू तूर डाळीचे भाव नियंत्रणात येताच सरकारनेही १२० रुपयांऐवजी ९५ रु. किलो दराने मॉलमध्ये तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच रेशन दुकानातून बीपीएल आणि अंत्योदय लाभार्र्थींसाठी तूर डाळ देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या तूर डाळीपेक्षा जास्त भावाने म्हणजे १०३ रुपये प्रतिकिलो असा भाव ठेवला. मॉलमध्ये स्वस्त आणि रेशन दुकानावर महाग अशी चर्चा सुरूझाली. रेशन दुकानदारांनीही सावध भूमिका घेत १-२ क्विंटल एवढीच तूर डाळ उचलली आणि आता तर ही डाळ रेशन दुकानांवरच पडून आहे. दुकानापर्यंत डाळ आणण्यासाठी प्रतिक्विंटल २५ रु. ट्रान्सपोर्ट जास्तीचा करावा लागतो. रेशनकार्डधारकांकडून डाळीला मागणी नसल्याने आठवडाभरापासून ती दुकानांतच पडून आहे. डाळ जुनी झाली की, त्यातील ओलसरपणा कमी होऊन ती वाळेल. म्हणजे वजन कमी होईल. सरकारला डाळ परत करताना प्रतिक्विंटलमागे मोठी घट होईल. त्याचा भुर्दंडही वेगळा पडेल, यामुळे रेशन दुकानदारही धास्तावलेले आहेत.