शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

तुती लागवडीत जालना आघाडीवर

By admin | Updated: July 29, 2015 00:46 IST

गंगाराम आढाव , जालना तुती लागवडीत जालना जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर असून, गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीत ही शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून

गंगाराम आढाव , जालना तुती लागवडीत जालना जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर असून, गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीत ही शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तुती लागवडीतून १४८ टन रेशिम कोष उत्पादन करून त्याचे सुमारे साडे तीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी आर. बी. हांदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तुती लागवडीसाठी बागायती क्षेत्र असने गरजेचे आहे. जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा, मागील वर्षी अत्यल्प पाऊस झालेला असतानाही. जिल्ह्यातील ७१४ बागायतदार शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. तुतीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाण्याचे योग्य नियोजन करून ठिबकद्वारे पाणी देवून योग्य प्रमाणात तुतीचे पाने उपलब्ध केले. या शेतकऱ्यांना रेशिम कार्यालयाच्या वतीने २ लाख ५२ हजार २५० अंड पुंज वाटप करण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांनी शेडनेडच्या माध्यमातून त्याची योग्य निगा राखून सुमारे १४७ टन रेशिम कोष उत्पादन केले. उत्पादन केलेल्या या रेशिम कोषला बाजारात २५० ते ३०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळाला. शेतकऱ्यांनी हे कोष कर्नाटक राज्यातील रामनगरम् बाजारात विक्री केले. त्यातून ३ कोटी ६७ लाख ५० हजाराचे उत्पादन झाले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत जालना जिल्ह्याने चार पट उत्पन्न घेवून रेशिम उद्योगात आघाडी मिळविलेली असल्याचे सांगून हांदे म्हणाले की, सन २०१५- १६ मध्ये जिल्ह्याला ३५० हेक्टरचे उद्दीष्ठये देण्यात आलेले आहे. त्यानुसार ११६५ एकर वरील क्षेत्रातील १०५४ शेतकऱ्यांनी अतापर्यंत नाव नोंदणी केलेली असून त्यातून ११ लाख ४५ हजार रूपये शेतकऱ्यांकडून कार्यालयातस प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तुती लागवड संबंधी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना तुती लागवडी संबधी माहिती दिली जाते. बाग तयार करण्यासंबधी, नेट सेट, आळीचे संगोपण याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना काही प्रमाणात अनुदानही उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मनरेगाचाही आधार ४तुती लागवडीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात लागवड करण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गत वर्षी २५२ लाभार्थींच्या शेतात मनरेगाच्या माध्यमातून लागवड करण्यात आली. त्याचा मोबादला सुमारे ५१ लाख रूपये वाटप करण्यात आला आहे. जिल्हा रेशिम कार्यालयाचे काम मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चारपटीने अधिक आहे. त्यामुळेच जिल्हा आघाडीवर आहे. मात्र कार्यालयात इतर जिल्ह्याच्या व कामाच्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. १ अधिकारी, ५ तांत्रिक कर्मचारी व ३ क वर्गीय कर्मचारी असे एकुण ९ कर्मचारी आहेत. दोन तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकूण ११ पदे मंजूर असली तरी कामाचा व्याप पाहता या कार्यालयात आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तुती लागवड ही बागायती क्षेत्रावर अधिक होते. कमी पावसाचा त्यास फटका बसतोच मात्र बागायदार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य वापर केल्यास एकदा लागवड केलेल्या तुतीतून १० ते १५ वर्ष उत्पन्न मिळू शकते. तसेच नेट सेड व ठिबक साठी अनुदानही शेतकऱ्यांना मिळत असल्याने त्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना होता. त्यामुळे सुशिक्षीत बेरोज युवकांनी तुती लागवडच्या माध्यमातून रेशीम उद्योगात यावे, असे आवाहन त्यांनी केले.