शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:43 IST

जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देतत्त्वज्ञान : ‘सुफी’चा समग्र इतिहास मांडणारे लेखक डॉ. मुहम्मद आजम यांच्याशी संवाद; ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ प्रकल्प

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डॉ. आजम अहमदनगर येथील अहमदनगर महाविद्यालयातून हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून १९९७ साली निवृत्त झाले. ते सुफी तत्त्वज्ञानाकडे फार आधीपासूनच आकर्षित झाले होते. ‘सुफींचे तत्त्वज्ञान म्हणजे साक्षात प्रेममंदिर! तेथे नियमितपणे भक्तीचा सुगंध दरवळतो. भक्तीचे चरमोत्कर्ष रूप म्हणजे प्रेम. अशा सुफी तत्त्वज्ञानाचा मी गेल्या ५० वर्षांपासून अभ्यास करीत आहे, असे ते सांगतात. आपणही याविषयी काही लिहावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी ७३ व्या वर्षी ‘सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा पहिला ग्रंथ लिहिला. त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कारासह इतर सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. लोकमत समूहातर्फे दिल्या जाणाºया ‘लोकरंग’ पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.२०१६ साली राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून डॉ. आजम यांच्याकडे ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या बृहद प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान, इस्लामी तत्त्वज्ञान आणि सुफी तत्त्वज्ञान यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. ते म्हणतात, सुफीवादाचा जन्म इस्लाम धर्माच्या शिकवणुकीतून झाला आहे. इस्लाम धर्म म्हणजे सुफी तत्त्वज्ञानाचा पाया. इस्लामचा अर्थ होतो अमन, शांती.हा शांतीचा संदेश जगभर पसरविणारे, हे शांतीचे तत्त्व मानवतेमध्ये निर्माण करणारे लोक म्हणजे सुफी संत. साधारणत: सातव्या-आठव्या शतकामध्ये इराणमध्ये सुफी पंथांची सुरुवात झाली. अबू याझीद, अल किंदी, अल फराबी, इब्न मस्काविया, इब्न सीना, अल गजाली अशा संतांनी सुरुवातीच्या काळात सुफी पंथाचा विकास केला. तेथून मग अनेक सुफी संत भारतात आले.तेराव्या शतकात महंमद तुघलक याने दौलताबादला राजधानी केल्यानंतर अनेक सुफी संत येथे आले आणि त्यांनी शांती आणि सद्भाव निर्माण केला. त्यामुळे मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.येथे सुफी संतांची मोठी परंपरा आहे. हजरत जर जरी जर बक्ष, हजरत गंज ए रवाँ, हजरत मोमीन आरिफ, हजरत बाबा शाह मुसाफिर, हजरत बाबा सईद पिलंग पोश, हजरत शहानूरमियाँ हमवी, असे औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद परिसरात अनेक मोठे सुफी संत होऊन गेले. डॉ. आजम यांनी सांगितले की, मराठवाड्यातून खºया अर्थाने सुफीवादाला मोठी चालनामिळाली.