शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:43 IST

जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देतत्त्वज्ञान : ‘सुफी’चा समग्र इतिहास मांडणारे लेखक डॉ. मुहम्मद आजम यांच्याशी संवाद; ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ प्रकल्प

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डॉ. आजम अहमदनगर येथील अहमदनगर महाविद्यालयातून हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून १९९७ साली निवृत्त झाले. ते सुफी तत्त्वज्ञानाकडे फार आधीपासूनच आकर्षित झाले होते. ‘सुफींचे तत्त्वज्ञान म्हणजे साक्षात प्रेममंदिर! तेथे नियमितपणे भक्तीचा सुगंध दरवळतो. भक्तीचे चरमोत्कर्ष रूप म्हणजे प्रेम. अशा सुफी तत्त्वज्ञानाचा मी गेल्या ५० वर्षांपासून अभ्यास करीत आहे, असे ते सांगतात. आपणही याविषयी काही लिहावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी ७३ व्या वर्षी ‘सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा पहिला ग्रंथ लिहिला. त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कारासह इतर सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. लोकमत समूहातर्फे दिल्या जाणाºया ‘लोकरंग’ पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.२०१६ साली राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून डॉ. आजम यांच्याकडे ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या बृहद प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान, इस्लामी तत्त्वज्ञान आणि सुफी तत्त्वज्ञान यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. ते म्हणतात, सुफीवादाचा जन्म इस्लाम धर्माच्या शिकवणुकीतून झाला आहे. इस्लाम धर्म म्हणजे सुफी तत्त्वज्ञानाचा पाया. इस्लामचा अर्थ होतो अमन, शांती.हा शांतीचा संदेश जगभर पसरविणारे, हे शांतीचे तत्त्व मानवतेमध्ये निर्माण करणारे लोक म्हणजे सुफी संत. साधारणत: सातव्या-आठव्या शतकामध्ये इराणमध्ये सुफी पंथांची सुरुवात झाली. अबू याझीद, अल किंदी, अल फराबी, इब्न मस्काविया, इब्न सीना, अल गजाली अशा संतांनी सुरुवातीच्या काळात सुफी पंथाचा विकास केला. तेथून मग अनेक सुफी संत भारतात आले.तेराव्या शतकात महंमद तुघलक याने दौलताबादला राजधानी केल्यानंतर अनेक सुफी संत येथे आले आणि त्यांनी शांती आणि सद्भाव निर्माण केला. त्यामुळे मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.येथे सुफी संतांची मोठी परंपरा आहे. हजरत जर जरी जर बक्ष, हजरत गंज ए रवाँ, हजरत मोमीन आरिफ, हजरत बाबा शाह मुसाफिर, हजरत बाबा सईद पिलंग पोश, हजरत शहानूरमियाँ हमवी, असे औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद परिसरात अनेक मोठे सुफी संत होऊन गेले. डॉ. आजम यांनी सांगितले की, मराठवाड्यातून खºया अर्थाने सुफीवादाला मोठी चालनामिळाली.