शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

आज आघाडीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: January 30, 2017 00:05 IST

जालना जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

 जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत पाच सर्कलवरुन सुरू असलेले मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्ह्यातही भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत बैठकांचे सत्र सुरु झाले. नेहमीप्रमाणे जागा वाटपावर मतभिन्नता दिसून आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर लढणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. राजेश टोपे यांनी सांगितले. तर काँग्रेसचा जनाधार वाढला असून, ग्रामीण भागात काँग्रेससाठी पूरक वातावरण असून, पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी घेतली. गत आठवडाभरापासून केवळ चर्चाच सुरु असल्याने यावर निर्णय होऊ शकलेला नाही. युती तुटल्याचे कळताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्यावर भर दिला आहे. मतविभाजन होणे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही, त्यामुळे काँग्रेसने दोन पाऊले पुढे यावे आणि आम्हीही दोन पाऊले मागे येऊ, असा आग्रह आ. राजेश टोपे यांनी धरला आहे. तर आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक असून, कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी आ. जेथलिया यांनी केली आहे. घनसांवगी, बदनापूर, भोकरदन आणि जालना या तालुक्यांतील काही जागांबाबत मतभेद आहेत. यावरच लवकरच तोडगा काढला जाईल. तसेच आघाडीवर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.