शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आज आघाडीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: January 30, 2017 00:05 IST

जालना जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

 जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत पाच सर्कलवरुन सुरू असलेले मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्ह्यातही भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत बैठकांचे सत्र सुरु झाले. नेहमीप्रमाणे जागा वाटपावर मतभिन्नता दिसून आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर लढणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. राजेश टोपे यांनी सांगितले. तर काँग्रेसचा जनाधार वाढला असून, ग्रामीण भागात काँग्रेससाठी पूरक वातावरण असून, पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी घेतली. गत आठवडाभरापासून केवळ चर्चाच सुरु असल्याने यावर निर्णय होऊ शकलेला नाही. युती तुटल्याचे कळताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्यावर भर दिला आहे. मतविभाजन होणे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही, त्यामुळे काँग्रेसने दोन पाऊले पुढे यावे आणि आम्हीही दोन पाऊले मागे येऊ, असा आग्रह आ. राजेश टोपे यांनी धरला आहे. तर आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक असून, कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी आ. जेथलिया यांनी केली आहे. घनसांवगी, बदनापूर, भोकरदन आणि जालना या तालुक्यांतील काही जागांबाबत मतभेद आहेत. यावरच लवकरच तोडगा काढला जाईल. तसेच आघाडीवर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.