शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 31, 2014 17:38 IST

हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. बदलत्या समाज संस्कृतीमध्ये वावरताना धूम्रपान करणार्‍यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वैैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तंबाखूमुळे मृत्यू ओढवणार्‍यांची संख्या देशात दरवर्षी १० लाखांवर गेली आहे. तंबाखू चघळणार्‍या वैैशिष्ट्यपूर्ण सवयींमुळे देशात दरवर्षी दरवर्षी ३ लाख लोकांना मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) होतो व त्यातील एक तृतीयांश जणांना मृत्यूला सामोरे जावे लागते. हे धक्कादायक वास्तव्य समोर आले असतानाही देशात ५५ टक्के पुरूष आणि १६ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. पुरूषांबरोबर महिलांमध्येही तंबाखू चघळण्याचे व धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामध्ये महिलांमधील तंबाखू संबंधित कॅन्सरचे प्रमाण २०१० मध्ये १०.१ टक्के तर २०११ मध्ये १३.१ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ३५ वर्ष वयावरील पुरूषांच्या तंबाखू सेवनाचे प्रमाण ६९.३ टक्के तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण ५७.७ टक्के असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय किशोरवयीन मुलांमध्येही धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. या मागचे मुख्य कारण वातावरण, समाजातील स्वत:विषयीची असुक्षितता वाटणे, किंवा मित्राच्या दबावामुळे प्रवृत्त होणे, ही असल्याची जाणकरांचे मत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: १७ ते २२ वर्षे वयोगटातील तरूणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आता पालकांनीच याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या पाल्यास तंबाखू सेवनापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान करणार्‍यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कमी वयातील मुले धूम्रपान करीत असल्याने त्यांनाही कर्करोग होवू शकतो. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. - डॉ.नंदकुमार करवा,वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रूग्णालय, हिंगोलीप्रत्येक सिगारेटमध्ये चार हजारपेक्षा जास्त रसायने असतात. त्यापैकी कमीत कमी ४३ रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा हानीकारक पदार्थ असतो. सिगारेटच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आदी आजार होतात. धूम्रपानामुळे दरवर्षी ३५ हजार जणांचा अतिउष्णता वाढून मृत्यू झाल्याचे तर ३ हजार ७०० जणांचा फुफ्फु साचा कर्करोग होवून मृत्यू झाल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर धूम्रपान सोडता येऊ शकते. प्रारंभी उदास वाटणे, निराश होणे, चिडचिड होणे किंवा झोप न येणे, या समस्या येऊ शकतात; परंतु निराश होता कामा नये. धूम्रपान सोडण्यासाठी निकोटीन पेंच हे रासायनिक द्रव्य शरीरावर लावल्यास व्यसनी व्यक्तीला धूम्रपान करण्याची इच्छा होत नाही, असे यासंदर्भात काम करणार्‍या मदतगटांचे म्हणणे आहे. कोलंबसबरोबर गेलेल्या खलाशांनी अमेरिकेतील रेड इंडियन्सकडून तंबाखूचे कलम युरोपात आले. तेथून ते स्पेनमार्गे जगभर पसरले. प्रारंभी ही औषधी वनस्पती म्हणून वापरली गेली; परंतु १६ व्या शतकापासून तंबाखूंच्या अनिष्ट परिणामांची शंका डॉक्टरांना येऊ लागली, असा तंबाखूचा इतिहास सांगतो.