शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

कारवाडी परिसरात अखेर टँंकरने पाणीपुरवठा सुरू

By admin | Updated: March 20, 2016 23:25 IST

हिंगोली : शहरातील खटकाळी बायपास भागातील कारवडी ग्रा. पं. अंतर्गत दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यास २० मार्चपासून सुरुवात झाली आहे

हिंगोली : शहरातील खटकाळी बायपास भागातील कारवडी ग्रा. पं. अंतर्गत दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यास २० मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी भटकंती काही प्रमाणात थांबण्यास मदत झाली आहे. कारवाडी परिसरातील जलस्त्रोत अनेक दिवसांपासून कोरडे पडले आहेत. या भागातील नागरिकांनी एक बोअर कोरडा पडल्याने दुसरा बोअर घेतला आहे. तर काहींनी तोच बोअर अधिक खोल घालण्याचा प्रयत्न करुनही पाणीच न लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. पालिकेचे पाणी मागील वर्षीपासून या भागात पोहोचण्याचे नाव नाही. त्यामुळे कारवाडी ग्रा.पं.च्या वतीने पं.स. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला होता. शिवाय पालकमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासन हलले. त्यावर गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड व कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. पाहणीत परिसरातील जलस्त्रोत पूर्णत: कोरडे झालेले दिसून आले. त्यामुळे टँकरच्या प्रस्तावाला मान्यता देवून टँकर सुरू केले. दोन टँकर देणार असून त्यावर ठराविक भाग विभागून दिल्याचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांनी सांगितले. यात एसटी कॉलनी, पुष्पक कॉलनी, वैष्णव नगर, सुुराणा नगर, सहकार नगर, राधे नगरी या भागात एक तर प्रगती कॉलनी, कांचन नगर, आशीर्वाद कॉलनी, ग्रामसेवक नगर, रामनगर, शांती नगर, आर्यन नगर, प्रकाश पार्क, रामाकृ ष्ण कॉलनी या परिसरातही एक टँकर उन्हाळाभर सुरू राहणार आहे. तरीही भागत नसल्यास आणखी एका टँकरची व्यवस्था केली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी राठोड यांनी आश्वासन दिल्याचे ग्रामसेवक खरात म्हणाले. (प्रतिनिधी)