शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फळपीक विम्यासाठी आॅक्टोबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:06 IST

प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरु आदी पिकांना लागू असून जिल्ह्यातील फळपिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत या पिकांचा विमा काढता येणार आहे.

जालना : प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरु आदी पिकांना लागू असून जिल्ह्यातील फळपिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत या पिकांचा विमा काढता येणार आहे.कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा आदी धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधित शेतकºयांना विमा संरक्षण व अर्थसाहाय्य देणे, फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, ही या योजनेची मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील महसूल मंडळासाठी निर्धारित केलेल्या फळ पिकांनाच सदर योजना लागू असणार आहे. महसूल मंडळात महावेधद्वारे स्थापन करण्यात आलेली हवामान केंद्रांची आकडेवाडी यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या महसूल मंडळात हवामान केंद्र नाही, अशा ठिकाणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेच्या हवामान केंद्राच माध्यमातून हवामानाच्या आकडेवारीची नोंद घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी आपल्या महसूल मंडळासाठी लागू असलेल्या मोसंबी, पेरु डाळिंब (आंबिया बहार) व केळी या फळ पिकांचा विमा ३१ आॅक्टोबरपर्यंत तर द्राक्षांचा विमा १५ आॅक्टोबरपर्यंत काढून घ्यावा. तसेच आंब्याचा विमा ३१ डिसेंबरपर्यंत बँकेच्या माध्यमातून काढून घ्यावा, अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी आपल्या महसूल मंडळासाठी लागू असलेल्या फळपिकाचा विम्याची माहिती कृषी विभागाकडून करून घ्यावी. त्यानंतर आपल्याकडील फळपिकांचा विमा वेळेत बँकेत भरावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले आहे.द्राक्षासाठी या महसूल मंडळांचा समावेशद्राक्ष फळपिकासाठी जालना तालुक्यातील वाघु्रळ जहांगीर, जालना ग्रामीण, रामनगर, पाचनवडगाव, जालना शहर, नेर, सेवली, विरेंगाव या मंडळांचा समावेश आहे. बदनापूर तालुक्यातील बदनापूर, शेलगाव, रोषणगाव, बावणेपांगरी या मंडळातील शेतक-यांना द्राक्ष विम्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.मोसंबीसाठी...मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर व ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघु्रळ जहाँगीर, सेवली. भोकदरन, सिपोरा, हसनाबाद राजूर, केदरखेडा, सिरोपा बाजार, पिंपळगाव रेणुकाई, बदनापूर, सेलगाव, दाभाडी, बावणेपांगरी, रोषणगाव, अंबड, धनगरपिंप्री, रोहिलागड, वडीगोद्री, गौंदी, सुखापुरी, घनसावंगी, राणीऊंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, सातोना बू., मंठा, पांगरीगोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळांचा समावेश आहे.