शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
3
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
4
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
5
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
6
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
7
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
8
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
9
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागर करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:52 IST

सेंट्रल आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचे रविवारी उदघाटन झाले.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना (कॉ.प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतून) : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून यासाठी जागर करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारालाही आपली भूमिका काय यावरही त्याला भाष्य अथवा लिहिण्यावर निर्बंध आणले जात असल्याने याविरूध्द जागर करण्याची गरज असल्याचा सूर रविवारी श्रमिक साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.सेंट्रल आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचे रविवारी उदघाटन झाले. दोन दिवस चालणाºया या परिसंवादात रविवारी कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सद्यस्थिती यावर परिसंवाद झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, कवी मंगेश काळे, नाट्यलेखक राजकुमार तांगडे, कवयित्री धम्म संगिनी, कादंबरीकार श्रीरंजन आवटे यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते.आपल्या लिहिण्यावर, बोलण्यावर गदा आणली जात आहे. सध्याची स्थिती फारच भयावह निर्माण झाली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम सध्या सुरू असल्याने श्रमिकांनी याविरूध्द आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्रीरंजन आवटे म्हणाले.जे सध्या प्रश्न विचारत आहेत, अशांची कोंडी केली जात आहे. फारच डोईजड झाल्यास त्यांची हत्या करण्यातही फॅसिस्ट विचारसरणीचे लोक मागे पुढे पाहत नसल्याने ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश सारखे बळी जात आहेत. देशासाठी सुध्दा धोक्याची घंटा असल्याचे याविरूध्द आवाज उठविणे गरजेचे असल्याचे नागपूर येथील कवयित्री धम्म संगिनी म्हणाल्या. प्रत्येक वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे मत कवी मंगेश काळे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांचा आवाज असलेली माध्यमेही विकली जात असल्याने देशात काय घडते हे कसे दाखवायचे, हे ठरविले जात आहे. आणि आपण सुध्दा हतबलपणे बघत आहोत हे दुर्दैवी असल्याचे काळे म्हणाले. पत्रकारांनाही आपले हक्क माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे म्हणाले की, पत्रकारिता शिकतानाच त्यात संविधानाचा एक वियष असावा.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी केंद्र शासनाचा चांगलाच समाचार घेतला. देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील, असे म्हणाले. आपण विभक्त असलेले लोक आहोत. आपण संघटित नसल्याचा फायदा सध्याची व्यवस्था घेत असल्याने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे डोळे म्हणाले. सरकार मधील लोक आपले अपयश लपविण्यासाठी लेखक, विचारवंताचे खून करीत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे डोळे म्हणाले. देशातील गरिबी, दारिद्र्य, रोजगार याविषयी कुठलाच कार्यक्रम शासनाकडे नाही. यामुळे हे सरकार धर्मव्यवस्थेच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादत असल्याचे डोळे यांनी खंत व्यक्त केली.