शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबादेत शिक्षकांवर आंदोलनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:58 IST

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रश्न सुटेना : शिक्षक भारतीच्या धरणे आंदोलनाला प्रतिसाद; जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने आज शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सायंकाळी काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांनी आंदोलनस्थळी जाऊन अधिकारी- पदाधिकाºयांना बोलावून घेतले. त्यावेळी शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, काँग्रेसचे पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकाºयांनी स्थायित्वाचे ६१३ प्रस्ताव प्रातिनिधिक स्वरुपात निकाली काढले व ते शिक्षक भारतीच्या पदाधिकाºयांकडे सुपूर्द केले.वेतनप्रणाली आॅनलाईन असो की आॅफलाईन, शिक्षकांचा पगार हा कधीच १० तारखेच्या आत झालेला नाही. विमा, बँक, रेल्वे विभागात एक तारखेलाच पगार होतो. जि.प.लाच नेमकी कोणती अडचण आहे. केंद्रप्रमुखांची ७५ पदे रिक्त असताना पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नाही. शालेय पोषण आहाराची देयके रखडली जातात. निमशिक्षक, अंशदायी पेन्शन इत्यादी प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.जि. प. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, अनिल देशमुख, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, राजेश भुसारी, किशोर कदम, मुश्ताक शेख, मच्छिंद्र भराडे, मच्छिंद्र शिंदे, रमेश जाधव, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत, स्वाती गवई, सुप्रिया सोसे, संजय बुचुडे, विजय ढाकरे, गणेश तोटावाड, दत्ता गायकवाड, रामदास कवठेकर, गोविंद उगले, संजय देव्हरे, अमरसिंग चंदेल, प्रवीण संसारे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.आ. सुभाष झांबड यांची भेटजिल्हा या आंदोलनाच्या वेळी आ. सुभाष झांबड यांनी भेट दिली. ते म्हणाले की, शिक्षकांच्या लहान-सहान प्रश्नांसाठी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ यावी, ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न समजून घेण्यात आमचे पदाधिकारी कमी पडले असावेत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्या. येत्या आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत तर विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.शिक्षक परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू शिक्षक व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, याबाबत शिक्षक परिषदेने अनेकवेळा शासनाला निवेदने सादर केली. या प्रश्नावर आंदोलनेही केली; परंतु याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. याशिवाय शिक्षक-कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिरंगाई होत आहे. यासंदर्भात आंदोलन करण्याचा ठराव राज्य कार्यकारिणीने घेतला होता.त्यानुसार आज शनिवारी शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्यानेही सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश करण्यात आला. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस सुधाकर म्हस्के, सुरेश पठाडे, बाबूराव गाडेकर, प्रभुलाल झलवार, श्रीराम बोचरे, दिलीप गोरे, प्रकाश लोखंडे, दिलीप कुंदे, जिजा उकर्डे, जगन ढोके, लता पठाडे, रेखा शिंदे, शीतल शेळके, संगीता बोरसे, आशा वैष्णव, सुशीला पवार, किरण गाडेकर, प्रकाश बोंबले, शिवाजी दांडगे, लक्ष्मण भोसले, संजय शेळके, दीपक नरवडे, अर्जुन दांडगे आदींनी परिश्रम घेतले.