शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लॉबीसमोर मनपा झुकली

By admin | Updated: May 23, 2016 01:23 IST

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादला मान खाली घालावी लागते.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादला मान खाली घालावी लागते. शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी पाच महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने स्वत:च्या मालकीचा डांबर प्लांट उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा ‘आम आदमी’ला होती. मात्र, हा प्लांट उभारण्यात येऊ नये म्हणून शहरातील डांबर लॉबीने कंबर कसली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनीही या लॉबीसमोर लोटांगण घालत डांबर प्लांटच्या प्रक्रियेत खोडा घातला आहे.अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये मनपाने डांबर प्लांट उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते. काही कंत्राटदारांनी मनपाला मोफत यंत्रणा देण्याचेही मान्य केले होते. डिसेंबर महिन्यात डांबर प्लांटच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नंतर तत्कालीन आयुक्तांची बदली होताच मनपा अधिकाऱ्यांनी सोयीनुसार यू-टर्न घेण्यास सुरुवात केली. पूर्वी अधिकारी डांबर प्लांट सहज उभारण्यात येईल, अशी भाषा करीत होते. आता हा प्रकल्प अशक्य आहे. पुढच्या वर्षी प्लांट टाकण्यात येईल. निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांची डांबर प्लांटमधील इच्छाशक्ती नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.महापालिकेत लहान मोठे मिळून १३ ते १५ डांबर, सिमेंट रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार आहेत. यामध्ये लहान कामे करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या बरीच आहे. महापालिकेने स्वत:चा डांबर प्लांट सुरू केल्यास छोटे कंत्राटदार उपाशी मरतील, अशी भीती अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे. छोटे कंत्राटदार दरवर्षी १० ते १२ कोटी रुपयांची कामे करतात. मोठे कंत्राटदार सुमारे २० कोटींपर्यंत कामे करतात. यामध्ये व्हाईट टॅपिंगची कामे करणारेही कंत्राटदार बरेच आहेत.