शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लॉबीसमोर मनपा झुकली

By admin | Updated: May 23, 2016 01:23 IST

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादला मान खाली घालावी लागते.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादला मान खाली घालावी लागते. शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी पाच महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने स्वत:च्या मालकीचा डांबर प्लांट उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा ‘आम आदमी’ला होती. मात्र, हा प्लांट उभारण्यात येऊ नये म्हणून शहरातील डांबर लॉबीने कंबर कसली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनीही या लॉबीसमोर लोटांगण घालत डांबर प्लांटच्या प्रक्रियेत खोडा घातला आहे.अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये मनपाने डांबर प्लांट उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते. काही कंत्राटदारांनी मनपाला मोफत यंत्रणा देण्याचेही मान्य केले होते. डिसेंबर महिन्यात डांबर प्लांटच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नंतर तत्कालीन आयुक्तांची बदली होताच मनपा अधिकाऱ्यांनी सोयीनुसार यू-टर्न घेण्यास सुरुवात केली. पूर्वी अधिकारी डांबर प्लांट सहज उभारण्यात येईल, अशी भाषा करीत होते. आता हा प्रकल्प अशक्य आहे. पुढच्या वर्षी प्लांट टाकण्यात येईल. निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांची डांबर प्लांटमधील इच्छाशक्ती नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.महापालिकेत लहान मोठे मिळून १३ ते १५ डांबर, सिमेंट रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार आहेत. यामध्ये लहान कामे करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या बरीच आहे. महापालिकेने स्वत:चा डांबर प्लांट सुरू केल्यास छोटे कंत्राटदार उपाशी मरतील, अशी भीती अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे. छोटे कंत्राटदार दरवर्षी १० ते १२ कोटी रुपयांची कामे करतात. मोठे कंत्राटदार सुमारे २० कोटींपर्यंत कामे करतात. यामध्ये व्हाईट टॅपिंगची कामे करणारेही कंत्राटदार बरेच आहेत.