शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

५५ लाख लिटर पाणी उचलूनही तहान भागेना

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन

राजकुमार जोंधळे , लातूरशहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन २ लाख ५० हजार असे दररोज पाणी उचलले जात आहे़ दिवसाला जवळपास ५५ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी संकलित करुन मनपाच्या १४० टॅँकरव्दारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाण्याची ओरड लातूरकरांची कायम आहे़ पुरेसे पाणी पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़एका कुटूंबाला ८ दिवसाला २०० लिटर पाणी दिल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी नागरिक मात्र यावर समाधानी नाहीत़ नियोजनाच्या अभावामुळे पाणी वितरण व्यवस्थित होत नसल्याचे नागरिक म्हणत आहेत़शहरातील एकूण ३५ प्रभागात प्रत्येकी दोन टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत पूर्णत: आटल्याने, पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न प्रशासनासमोर होता. आज पाणी संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मात्र संकलित पाण्याची वितरण व्यवस्था ‘ढिसाळ’ असल्याने पाण्याला पाय फुटू लागले आहेत. काही नगरसेवकांची दांडगाई आणि ज्यांच्या मनगटात पाणी आहे, अशा नगरसेवकांकडून प्रशासनाच्या छाताडावर बसून हे टॅँकर पळविले जात आहेत. पाणी वाटपात होणारा दुजाभाव सर्वसामान्यांच्या मुळावर उठला आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर आपली तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना पाणीटंचाईच्या झळांची ‘झळ’ लागत नाही. मात्र ज्यांना घोटभर पाण्यासाठी शहरातील सार्वजनिक विंधन विहरीवर थांबावे लागते, अशांचे बेहाल आहेत. ४४ अंश उन्हाच्या चटक्यासोबत आता पाणीटंचाईचा चटकाही सहन करण्याची वेळ लातुरातील सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. इथल्या सर्वसामान्यांना दुष्काळ भयान वाटत असला तरी, प्रशासनाला मात्र तो ‘सुकाळ’च वाटतो आहे.शहरात संकलित करण्यात आलेल्या पाण्याचे टॅँकरच प्रशासनाच्या मदतीने काही नगरसेवकांनी पळविल्याची माहिती आता पुढे आली आहे. एकाच प्रभागात सातत्याने पाणीपुरवठा केला जात असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. ज्या प्रभागात गेल्या तीन आठवड्यांपासून टॅँकरच फिरकले नाही, अशा नागरिकांनी पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्री केली आहे. भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून मात्र पाणीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव आणि साई बॅरेजेसमधून एवढे पाणी उचलूनही शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी नसल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़