शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाख लिटर पाणी उचलूनही तहान भागेना

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन

राजकुमार जोंधळे , लातूरशहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन २ लाख ५० हजार असे दररोज पाणी उचलले जात आहे़ दिवसाला जवळपास ५५ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी संकलित करुन मनपाच्या १४० टॅँकरव्दारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाण्याची ओरड लातूरकरांची कायम आहे़ पुरेसे पाणी पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़एका कुटूंबाला ८ दिवसाला २०० लिटर पाणी दिल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी नागरिक मात्र यावर समाधानी नाहीत़ नियोजनाच्या अभावामुळे पाणी वितरण व्यवस्थित होत नसल्याचे नागरिक म्हणत आहेत़शहरातील एकूण ३५ प्रभागात प्रत्येकी दोन टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत पूर्णत: आटल्याने, पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न प्रशासनासमोर होता. आज पाणी संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मात्र संकलित पाण्याची वितरण व्यवस्था ‘ढिसाळ’ असल्याने पाण्याला पाय फुटू लागले आहेत. काही नगरसेवकांची दांडगाई आणि ज्यांच्या मनगटात पाणी आहे, अशा नगरसेवकांकडून प्रशासनाच्या छाताडावर बसून हे टॅँकर पळविले जात आहेत. पाणी वाटपात होणारा दुजाभाव सर्वसामान्यांच्या मुळावर उठला आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर आपली तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना पाणीटंचाईच्या झळांची ‘झळ’ लागत नाही. मात्र ज्यांना घोटभर पाण्यासाठी शहरातील सार्वजनिक विंधन विहरीवर थांबावे लागते, अशांचे बेहाल आहेत. ४४ अंश उन्हाच्या चटक्यासोबत आता पाणीटंचाईचा चटकाही सहन करण्याची वेळ लातुरातील सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. इथल्या सर्वसामान्यांना दुष्काळ भयान वाटत असला तरी, प्रशासनाला मात्र तो ‘सुकाळ’च वाटतो आहे.शहरात संकलित करण्यात आलेल्या पाण्याचे टॅँकरच प्रशासनाच्या मदतीने काही नगरसेवकांनी पळविल्याची माहिती आता पुढे आली आहे. एकाच प्रभागात सातत्याने पाणीपुरवठा केला जात असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. ज्या प्रभागात गेल्या तीन आठवड्यांपासून टॅँकरच फिरकले नाही, अशा नागरिकांनी पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्री केली आहे. भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून मात्र पाणीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव आणि साई बॅरेजेसमधून एवढे पाणी उचलूनही शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी नसल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़