शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु- मिश्रा

By admin | Updated: September 13, 2014 23:28 IST

भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी

भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भोकरदन मतदार संघासाठी २० सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. २७ सप्टेंबरला नामाकंन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून २९ रोजी छाननी व १ आॅक्टोंबर रोजी उमेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचप्रमाणे १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून १९ अॉक्टोबर रोजी शासकिय विश्रामगृहासमोरील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणी होईल. त्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. या मतदारांना सुध्दा या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार असल्याचे मिश्रा यांनी सागिंतले़ या मतदार संघात भोकरदन तालुक्यातील पाच महसूली मंडळाचा समावेश असून जाफ्राबाद तालुुक्यातील पाच महसूली मंडळातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गरबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. आचासंहिता सुरू झाल्या पासुन गावा गावात सर्व पक्षाचे लावण्यात आलेले उदघाटनाचे फलक, बॅनर, तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी भोकरदनच्या तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रूपा चित्रक, जाफ्राबादचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार आऱजे़डोळे, एस़जी़ डोळस हे उपस्थित होते़आ. चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयात शासकीय योजनांचे अर्ज वाटप केले जात असल्याची तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पक्षाचे चिन्ह व पैशाचे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. मिश्रा यांनी दोन्ही ठिकाणचे चित्रिकरण करून प्रकरण आचारसंहिता कक्षाकडे वर्ग केल्या आहेत. (वार्ताहर)मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गडबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मिश्रा यांनी यावेळी केले.