शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गारांचा पाऊस !

By admin | Updated: April 29, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कसबे तडवळे, गंभीरवाडी परिसरात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे गारा बरसल्या. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाल असला तरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला आहे. विजा पडून तीन जनावरे दगावली आहेत.मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. शनिवारी दिवसभर यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. साधारपणे दुपारी चार वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील उकाडा आणखीच वाढला. साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान पावसाळ्याप्रमाणे काळेकु ट्ट ढग जमा झाले. आणि काही क्षणातच जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. कळंब तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, आंदोरा, पाथर्डी आदी गावात सव्वापाच वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पावसासोबत वादळी वारेही सुरू होते. साधारणपणे पावणेसहा वाजेच्या सुमारास आंदोरा परिसरात पावसाचा जोर वाढला. गावातील रस्त्यांवरून पावसाळ्याप्रमाणे पाणी वाहिले. तसेच साडेसहा वाजेच्या सुमारास गंभीरवाडी शिवारातही जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारा बरसल्या. या पावसामुळे शेतातून पाणी बाहेर पडले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसासोबतच सुपारीच्या आकाराच्या गाराही बरसल्या. पावसादरम्यान वीज पडून शेतकरी भागवत होगले यांचा घोडा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी आंब्यासह अन्य फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)