शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गारांचा पाऊस !

By admin | Updated: April 29, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कसबे तडवळे, गंभीरवाडी परिसरात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे गारा बरसल्या. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाल असला तरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला आहे. विजा पडून तीन जनावरे दगावली आहेत.मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. शनिवारी दिवसभर यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. साधारपणे दुपारी चार वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील उकाडा आणखीच वाढला. साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान पावसाळ्याप्रमाणे काळेकु ट्ट ढग जमा झाले. आणि काही क्षणातच जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. कळंब तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, आंदोरा, पाथर्डी आदी गावात सव्वापाच वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पावसासोबत वादळी वारेही सुरू होते. साधारणपणे पावणेसहा वाजेच्या सुमारास आंदोरा परिसरात पावसाचा जोर वाढला. गावातील रस्त्यांवरून पावसाळ्याप्रमाणे पाणी वाहिले. तसेच साडेसहा वाजेच्या सुमारास गंभीरवाडी शिवारातही जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारा बरसल्या. या पावसामुळे शेतातून पाणी बाहेर पडले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसासोबतच सुपारीच्या आकाराच्या गाराही बरसल्या. पावसादरम्यान वीज पडून शेतकरी भागवत होगले यांचा घोडा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी आंब्यासह अन्य फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)