शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

गारांचा पाऊस !

By admin | Updated: April 29, 2017 23:48 IST

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कसबे तडवळे, गंभीरवाडी परिसरात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे गारा बरसल्या. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाल असला तरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला आहे. विजा पडून तीन जनावरे दगावली आहेत.मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. शनिवारी दिवसभर यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. साधारपणे दुपारी चार वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील उकाडा आणखीच वाढला. साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान पावसाळ्याप्रमाणे काळेकु ट्ट ढग जमा झाले. आणि काही क्षणातच जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. कळंब तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, आंदोरा, पाथर्डी आदी गावात सव्वापाच वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पावसासोबत वादळी वारेही सुरू होते. साधारणपणे पावणेसहा वाजेच्या सुमारास आंदोरा परिसरात पावसाचा जोर वाढला. गावातील रस्त्यांवरून पावसाळ्याप्रमाणे पाणी वाहिले. तसेच साडेसहा वाजेच्या सुमारास गंभीरवाडी शिवारातही जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारा बरसल्या. या पावसामुळे शेतातून पाणी बाहेर पडले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसासोबतच सुपारीच्या आकाराच्या गाराही बरसल्या. पावसादरम्यान वीज पडून शेतकरी भागवत होगले यांचा घोडा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी आंब्यासह अन्य फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)