औरंगाबाद : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी जुन्या मोंढ्यात एकापाठोपाठ चार दुकाने व एक घर फोडले. या दुकानांमधून रोख रक्कम, केशर, काजू, बदाम व किराणा माल, असा लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी पळविला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जुन्या मोंढ्यात सुनील कांकरिया यांचे संजयकुमार अँड सन्स नावाचे किराणा मालाचे होलसेलचे दुकान आहे. दुकानाला लागूनच रिटेल मालाचेही गोदाम आहे. रात्री ठीक साडेबारा वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी मागे असलेल्या गोदामाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. गोदामातील काही माल चोरल्यानंतर चोरटे पुढच्या होलसेलच्या दुकानात घुसले. येथून गल्ल्यातील रोख रक्कम, तसेच काजू, बदाम व केशरची पाकिटे, असा सुमारे दोन लाखांचा माल चोरी करून चोरटे बाहेर पडले. मग चोरट्यांनी तेथून आपला मोर्चा बाजूलाच असलेल्या भगवानदास फुलवाणी यांच्या लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीकडे वळविला. या दुकानाच्याही छताचा चोरट्यांनी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. या दुकानातून नेमका किती माल चोरी गेला हे कळू शकले नाही.
चोरट्यांचा धुमाकूळ
By admin | Updated: December 22, 2014 01:21 IST