शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कारमधून लोणावळा ते औरंगाबाद ‘घोणस’ चित्तथरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कारमधून लोणावळा ते औरंगाबाद असा सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आलेला दुर्मिळ विषारी ‘हिरवा घोणस’ साप ...

औरंगाबाद : कारमधून लोणावळा ते औरंगाबाद असा सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आलेला दुर्मिळ विषारी ‘हिरवा घोणस’ साप शनिवारी दुपारी सर्पमित्राने पकडून तो सुरक्षितपणे वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला. तथापि, या जातीच्या सापाचे वास्तव्य प्रामुख्याने जंगलातील झाडावर असल्यामुळे तो या भागातील नसल्याचा दावा वनरक्षक एच. के. गुसिंगे यांनी केला आहे.

आशिष मेहता (रा. उल्कानगरी) हे दोन दिवसापूर्वी कामानिमित्त लोणावळा येथे गेले होते. तेथे त्यांनी एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपली कार उभी केली. त्यावेळी कारमध्ये साप शिरला असावा. ते काल औरंगाबादेत परतले. तेव्हा एकाने त्यांच्या कारच्या व्हील कॅपमध्ये साप जात असल्याचे पाहिले व ही बाब त्यांनी मेहता यांना सांगितली. मेहता यांनी लगेच सर्पमित्र श्रीकांत वाहुळे यांना बोलावून घेतले. वाहुळे यांनी त्या सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

औरंगाबादमध्ये या जातीचा साप सर्पमित्र श्रीकांत वाहुळे यांनी पहिल्यांदाच पाहिला. सापाची खात्री करून घेण्यासाठी वन्यजीव अभ्यासक आदि गुडे यांना त्यांनी बोलावून घेतले. गुडे यांनी हा साप पाहून तो ‘हिरवा घोणस’ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या सापाला वनविभागाचे वनरक्षक एच. के. गुसिंगे यांच्याकडे सुपूर्द केले.

चौकट.........

जंगलात झाडावर वास्तव्य...

हा साप अतिशय दुर्मिळ प्रजातीमध्ये मोडतो. याचे वास्तव्य जंगलातील झाडावर असून त्याचे प्रमुख खाद्य हे पक्षी, त्यांची अंडी, पिल्ले असते, असे वनरक्षक एच. के. गुसिंगे यांनी सांगितले. (फोटो)