शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतर चूक झाल्याचा साक्षात्कार !

By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST

उस्मानाबाद : ‘ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा साक्षात्कार निविदा प्रसिद्धीनंतर झाला

उस्मानाबाद : ‘ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा साक्षात्कार निविदा प्रसिद्धीनंतर झाला. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेकडून दीड कोटी रुपये खर्चाचे सास्तूर येथील उपकेंद्र रद्द केले आहे. या प्रकारावरून लोहारा पंचायत समितीचे सभापती चांगलेच संतप्त झाले होते.भूकंप प्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सास्तूर येथे जिल्हा परिषदेने आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, ही मागणी लोहारा पंचायत समितीचे सभापती आसिफ मुल्ला यांनी लावून धरल्याने २०१२ मध्ये तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला होता. त्यानंतर २०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये उपकेंद्र उभारणीसाठी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल १ कोटी ६५ लाख रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. उपकेंद्र मंजूर करू घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मुल्ला यांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर या कामाची निविदाही काढण्यात आली. १ जानेवारीपर्यंत ही निविदा आॅनलाईन दिसत होती. परंतु, २ जानेवारीपासून सदरील टेंडर ब्लॉक करण्यात आले. त्याला कारणही तितकेच मजेशीर आहे. निविदा पक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाला ‘ग्रामीण रूग्णालयाच्या ठिकाणी उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा शोध लागला आहे. तसा शासन आदेश असल्याचे सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी गुरूवारी सर्वसाधारण सभेत सांगिले. यावरून आसिफ मुल्ला चांगलेच आक्रमक झाले होते. या नियमाचा आत्ताच कसा साक्षात्कार झाला? असा सवालही त्यांनी यावेळी केला. अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींची प्रतार्णा केली जात असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, मुल्ला शांत होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. हा सर्व चुकीचा खटाटोप तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाश्मी यांनी केला आहे. त्यामुळे चूक निदर्शनास येवूनही त्याकडे कानाडोळा करता येणार नाही, असे सांगत याबाबत जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे मार्गदर्शन मागवून तोडगा काढू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) सास्तूरची लोकसंख्या लक्षात घेवून त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. त्यामुळेच उपकेंद्र मंजूर करून घेण्यात आले होते. मात्र, तीन वर्षानंतर ही प्रक्रिया सुकीची झाल्याचे सांगत प्रशासनाकडून काम रद्द करण्यात आले आहे. हा प्रकार जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा आहे. याबाबत तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चुकीची प्रक्रिया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.