शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

तीन वर्षानंतर चूक झाल्याचा साक्षात्कार !

By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST

उस्मानाबाद : ‘ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा साक्षात्कार निविदा प्रसिद्धीनंतर झाला

उस्मानाबाद : ‘ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा साक्षात्कार निविदा प्रसिद्धीनंतर झाला. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेकडून दीड कोटी रुपये खर्चाचे सास्तूर येथील उपकेंद्र रद्द केले आहे. या प्रकारावरून लोहारा पंचायत समितीचे सभापती चांगलेच संतप्त झाले होते.भूकंप प्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सास्तूर येथे जिल्हा परिषदेने आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, ही मागणी लोहारा पंचायत समितीचे सभापती आसिफ मुल्ला यांनी लावून धरल्याने २०१२ मध्ये तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला होता. त्यानंतर २०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये उपकेंद्र उभारणीसाठी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल १ कोटी ६५ लाख रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. उपकेंद्र मंजूर करू घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मुल्ला यांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर या कामाची निविदाही काढण्यात आली. १ जानेवारीपर्यंत ही निविदा आॅनलाईन दिसत होती. परंतु, २ जानेवारीपासून सदरील टेंडर ब्लॉक करण्यात आले. त्याला कारणही तितकेच मजेशीर आहे. निविदा पक्रिया सुरू झाल्यानंतर प्रशासनाला ‘ग्रामीण रूग्णालयाच्या ठिकाणी उपकेंद्र सुरू करता येत नाही’ या नियमाचा शोध लागला आहे. तसा शासन आदेश असल्याचे सध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी गुरूवारी सर्वसाधारण सभेत सांगिले. यावरून आसिफ मुल्ला चांगलेच आक्रमक झाले होते. या नियमाचा आत्ताच कसा साक्षात्कार झाला? असा सवालही त्यांनी यावेळी केला. अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींची प्रतार्णा केली जात असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, मुल्ला शांत होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. हा सर्व चुकीचा खटाटोप तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाश्मी यांनी केला आहे. त्यामुळे चूक निदर्शनास येवूनही त्याकडे कानाडोळा करता येणार नाही, असे सांगत याबाबत जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे मार्गदर्शन मागवून तोडगा काढू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी) सास्तूरची लोकसंख्या लक्षात घेवून त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू व्हावे, अशी जनतेची मागणी आहे. त्यामुळेच उपकेंद्र मंजूर करून घेण्यात आले होते. मात्र, तीन वर्षानंतर ही प्रक्रिया सुकीची झाल्याचे सांगत प्रशासनाकडून काम रद्द करण्यात आले आहे. हा प्रकार जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा आहे. याबाबत तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चुकीची प्रक्रिया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.