शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुके झाले टँकरमुक्त

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़ तिन्ही तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावच्या पाणीपुरवठा योजना गोदापात्रातून असल्याने पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे़ आॅक्टोबर २०१३ च्या दरम्यान बहुचर्चित बाभळी बंधार्‍याला गेट बसविण्यात आले़ तत्पूर्वी बाभळी बंधारा कृती समितीचा लढा सुपरिचित आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाभळी बंधार्‍यावर गेट बंद करण्यात आले़ गेट बंद होताच गोदावरी नदी पात्राची पातळी व जलस्तर हळहळू वाढू लागला व उन्हाळ्यातही गोदावरी नदी पात्रात काठोकाठ पाणी दिसू लागले व पावसाळ्याप्रमाणे गोदावरीत जलसाठा जमा झाला़ बाभळी बंधार्‍यामुळे पाच तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे़ जलस्तर वाढल्याने शेती सुजलाम् सुफलाम् होवू लागली़ दरम्यान, गोदावरी नदीपात्रात बिलोली, उमरी, धर्माबाद तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आहेत़ ग्रामीण भागापाठोपाठ कुंडलवाडी शहराची पाणीपुरवठा योजनाही गोदावरीतच आहे़ धर्माबाद शहराला पाणीपुरवठा गोदावरीतूनच होतो़ तर बिलोली शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित करण्यात आली़ तालुक्यातील २४ गावांच्या तर धर्माबाद तालुक्यातील १८ व नायगाव तालुक्यातील १० गावांच्या व उमरी तालुक्यातील १० गावांच्या योजना गोदावरी पात्रातच आहेत़ अशा योजनाद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत आहे़ पाणीपुरवठा योजना पाठोपाठ भूगर्भातील जलसाठा व स्तर वाढल्याची माहिती भूजल विभागाकडून मिळाली़ कित्येक गावात बंद पडलेल्या विहिरींना सुद्धा पाणी आल्याच्या घटना समोर आल्या़ नदी परिसरातील ५० ते ६० कि़मी़ अंतरावर असलेल्या गावांत विंधन विहिरींना कमी अंतरावर (फुटावर) पाणी लागत असल्याचे पुढे आले आहे़ बाभळी बंधा्रयाचा परिणाम तातडीने जाणवू लागला आहे़ परिणामी बिलोली, धर्माबाद व उमरी ही गोदागाठची तालुके टँकरमुक्त झाली आहेत व पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे़ बाभळी बंधार्‍याचा यशस्वी लढ्याची चर्चा पाणीटंचाई संपल्याने आता पुढे आली आहे़ यावर्षी पावसाळ्यातली सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालेला असला तरी बाभळी बंधार्‍यामुळे भविष्यातही पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे जाणकार सांगत आहेत़