शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

तीन तालुके झाले टँकरमुक्त

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़ तिन्ही तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावच्या पाणीपुरवठा योजना गोदापात्रातून असल्याने पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे़ आॅक्टोबर २०१३ च्या दरम्यान बहुचर्चित बाभळी बंधार्‍याला गेट बसविण्यात आले़ तत्पूर्वी बाभळी बंधारा कृती समितीचा लढा सुपरिचित आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाभळी बंधार्‍यावर गेट बंद करण्यात आले़ गेट बंद होताच गोदावरी नदी पात्राची पातळी व जलस्तर हळहळू वाढू लागला व उन्हाळ्यातही गोदावरी नदी पात्रात काठोकाठ पाणी दिसू लागले व पावसाळ्याप्रमाणे गोदावरीत जलसाठा जमा झाला़ बाभळी बंधार्‍यामुळे पाच तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे़ जलस्तर वाढल्याने शेती सुजलाम् सुफलाम् होवू लागली़ दरम्यान, गोदावरी नदीपात्रात बिलोली, उमरी, धर्माबाद तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आहेत़ ग्रामीण भागापाठोपाठ कुंडलवाडी शहराची पाणीपुरवठा योजनाही गोदावरीतच आहे़ धर्माबाद शहराला पाणीपुरवठा गोदावरीतूनच होतो़ तर बिलोली शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित करण्यात आली़ तालुक्यातील २४ गावांच्या तर धर्माबाद तालुक्यातील १८ व नायगाव तालुक्यातील १० गावांच्या व उमरी तालुक्यातील १० गावांच्या योजना गोदावरी पात्रातच आहेत़ अशा योजनाद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत आहे़ पाणीपुरवठा योजना पाठोपाठ भूगर्भातील जलसाठा व स्तर वाढल्याची माहिती भूजल विभागाकडून मिळाली़ कित्येक गावात बंद पडलेल्या विहिरींना सुद्धा पाणी आल्याच्या घटना समोर आल्या़ नदी परिसरातील ५० ते ६० कि़मी़ अंतरावर असलेल्या गावांत विंधन विहिरींना कमी अंतरावर (फुटावर) पाणी लागत असल्याचे पुढे आले आहे़ बाभळी बंधा्रयाचा परिणाम तातडीने जाणवू लागला आहे़ परिणामी बिलोली, धर्माबाद व उमरी ही गोदागाठची तालुके टँकरमुक्त झाली आहेत व पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे़ बाभळी बंधार्‍याचा यशस्वी लढ्याची चर्चा पाणीटंचाई संपल्याने आता पुढे आली आहे़ यावर्षी पावसाळ्यातली सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालेला असला तरी बाभळी बंधार्‍यामुळे भविष्यातही पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे जाणकार सांगत आहेत़