शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

तीन तालुके झाले टँकरमुक्त

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़

राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्‍याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़ तिन्ही तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावच्या पाणीपुरवठा योजना गोदापात्रातून असल्याने पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे़ आॅक्टोबर २०१३ च्या दरम्यान बहुचर्चित बाभळी बंधार्‍याला गेट बसविण्यात आले़ तत्पूर्वी बाभळी बंधारा कृती समितीचा लढा सुपरिचित आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाभळी बंधार्‍यावर गेट बंद करण्यात आले़ गेट बंद होताच गोदावरी नदी पात्राची पातळी व जलस्तर हळहळू वाढू लागला व उन्हाळ्यातही गोदावरी नदी पात्रात काठोकाठ पाणी दिसू लागले व पावसाळ्याप्रमाणे गोदावरीत जलसाठा जमा झाला़ बाभळी बंधार्‍यामुळे पाच तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे़ जलस्तर वाढल्याने शेती सुजलाम् सुफलाम् होवू लागली़ दरम्यान, गोदावरी नदीपात्रात बिलोली, उमरी, धर्माबाद तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आहेत़ ग्रामीण भागापाठोपाठ कुंडलवाडी शहराची पाणीपुरवठा योजनाही गोदावरीतच आहे़ धर्माबाद शहराला पाणीपुरवठा गोदावरीतूनच होतो़ तर बिलोली शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित करण्यात आली़ तालुक्यातील २४ गावांच्या तर धर्माबाद तालुक्यातील १८ व नायगाव तालुक्यातील १० गावांच्या व उमरी तालुक्यातील १० गावांच्या योजना गोदावरी पात्रातच आहेत़ अशा योजनाद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत आहे़ पाणीपुरवठा योजना पाठोपाठ भूगर्भातील जलसाठा व स्तर वाढल्याची माहिती भूजल विभागाकडून मिळाली़ कित्येक गावात बंद पडलेल्या विहिरींना सुद्धा पाणी आल्याच्या घटना समोर आल्या़ नदी परिसरातील ५० ते ६० कि़मी़ अंतरावर असलेल्या गावांत विंधन विहिरींना कमी अंतरावर (फुटावर) पाणी लागत असल्याचे पुढे आले आहे़ बाभळी बंधा्रयाचा परिणाम तातडीने जाणवू लागला आहे़ परिणामी बिलोली, धर्माबाद व उमरी ही गोदागाठची तालुके टँकरमुक्त झाली आहेत व पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे़ बाभळी बंधार्‍याचा यशस्वी लढ्याची चर्चा पाणीटंचाई संपल्याने आता पुढे आली आहे़ यावर्षी पावसाळ्यातली सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालेला असला तरी बाभळी बंधार्‍यामुळे भविष्यातही पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे जाणकार सांगत आहेत़