शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

दर २४ तासाला तीन आत्महत्या !

By admin | Updated: February 17, 2015 00:39 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ वर्षभरात विविध घटनेत १ हजार ७९ जणांनी मृत्यूला कवठाळल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे़

बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ वर्षभरात विविध घटनेत १ हजार ७९ जणांनी मृत्यूला कवठाळल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे़ विषारी द्रव, चिमणीचा भडका, विहिरीत उडी तर कोणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़ दर २४ तासाला जिल्ह्यात तीन जण आत्महत्या करीत असल्याचे वर्षभराच्या आकडेवारीतून पुढे आले आहे़ आधुनिक युगात मानवाला सुख सुविधा वाढल्या असल्या तरी मानसिक समाधान नसल्याचेच यावरून दिसत आले़ किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ पतीने रागावले, शेतीचे उत्पादन घटले, पालकांनी रागावले, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, कर्जाचे डोंगर, मानसिक स्थिती बिघडली आदी कारणांमुळे मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाण आता वाढत आहे़ लातूर जिल्ह्याची ओळख शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न म्हणून राज्यभर आहे़ शैक्षणिक वातावरण पोषक असल्याने याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा अधिक आहे़ तसेच कृषी उत्पन्न समितीची ओळख शेती मालाचे रोखीने व्यवहार यातून आहे़ शिवाय सहकारी साखर कारखाना असो की जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारातून उध्दार हा लातूर पॅटर्न राज्यभर नावाजलेला असताना आत्महत्यांचे सत्र वाढत असल्याने घातक ओळख जिल्ह्यापुढे आली आहे़ वर्षभरात विविध कारणांमुळे झालेल्या आत्महत्यांची संख्या ही अचंबीत करणारी आहे़ स्पर्धेच्या युगात धावपळ वाढल्याने लोकांच्या इच्छा, आकांक्षा वाढत चालल्या आहेत़ त्यातूनच काही तरी वेगळे करण्याच्या भानगडीत जाऊन नुकसान झाल्यावर आर्थिक विवंचनेतही काहींनी आत्महत्या केल्या आहेत़ विकासाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्याला मागील काही वर्षांपासून जणू ग्रहणच लागले आहे़ त्यातूनच काही आत्महत्या झाल्याचेही उघड झाले आहे़ जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या १२ महिन्यात विविध कारणांमुळे १ हजार ७९ मृत्यूची नोंद झाली आहे़ पोलिस दप्तरी बहुतांश प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तर आत्महत्येचे हे प्रमाण चिंतन करायला लावणारे आहे़ वर्ष २०१३ मध्येही १ हजार ८० मृत्यूच्या घटना घडल्या असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या डायरीत नोंद आहे़