शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सिल्लोडमध्ये तीन कत्तलखान्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:09 IST

सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले. तर कत्तलीसाठी टेम्पोत भरून आणलेली सात जनावरे व कत्तलखान्यात बांधून ठेवलेली जिवंत ११ जनावरे अशी एकूण अठरा जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली.तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतला आहे. एवढ्या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी बिराजदार हे आपल्या घराकडून कार्यालयाकडे जात असताना त्यांना जनावरे भरून जात असलेला टेम्पो दिसल्याने त्यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला; मात्र टेम्पोचालकाने वाहन न थांबवता भरधाव शहरातील ईदगाहकडे पळ काढला. बिराजदार यांनी त्याचा पाठलाग केला असता ईदगाहजवळ चालकाने टेम्पो थांबवून तेथून पळ काढला. बिराजदार यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात सात जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी टेम्पो जनावरासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला.या कारवाईत दोन ट्रक अंदाजे किंमत १५ लाख रुपये, पाच टेम्पो अंदाजे किंमत २० लाख, चार बोलेरो पिकअप अंदाजे किंमत १६ लाख, एक टोयोटा क्वालिस गाडी अंदाजे किंमत ४ लाख, एक सेंट्रो कार अंदाजे किंमत २ लाख, तीन आयशर वाहने अंदाजे किंमत २४ लाख, एक बजाज पल्सर मोटारसायकल अंदाजे किंमत २० हजार, एक टेम्पो अंदाजे किंमत ५ लाख, १८ जिवंत जनावरे अंदाजे किंमत १ लाख ८० हजार तसेच तब्बल ४० टन मांस अंदाजे किंमत ५६ लाख रुपये असा एकूण १ कोटी ४४ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले. यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी सांगितले.मुंबई व विदेशात मांस रवानासदर मांस हे सिल्लोडहून मुंबई व नंतर विदेशात नेण्यात येते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ईदगाह रोडवरील ५ पैकी ३ कत्तलखान्यावर शनिवारी धाडी घालण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.असा आला संशयबिराजदार यांनी जनावरे भरलेला टेम्पो ईदगाहच्या दिशेनेच का गेला याची चौकशी सुरु करुन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगीरथ देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील, अजिंठा ठाण्याचे सपोनि. किरण आहेर यांना तातडीने फौजफाट्यासह शहरात बोलावून घेतले व तिन्ही कत्तलखान्यांवर छापा मारला असता त्यांना शेकडो जनावरांची कत्तल झालेली दिसली. सर्वत्र मासच मास दिसल्याने पोलीसही चक्रावून गेले.जनावरांच्या चरबीचे केले तूपकत्तलखान्यांची भीषणता पाहून पोलिसांनी तपासाला वेग दिला असता कत्तलखान्यात जवळपास १५० डबे वनस्पती तूप सापडले. हे तूप जनावरांच्या चरबीपासून तयार करण्यात आलेले असून तेही पोलिसांनी जप्त केल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी १०० ते १५० महिला हातात लाठ्या व दगड घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.