शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जलपरीच्या तीन फेऱ्या झाल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:47 IST

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़ आवक कमी आणि जावक अधिक असल्याने मनपा प्रशासन अडचणीत सापडले आहे़ रविवार व सोमवारी जलपरी आली नसल्याने मनपा प्रशासनाने डोंगरगाव, बेलकुंड येथून टँकरद्वारे जवळपास १२ लाख लिटर पाणी जास्त आणले आहे़ दोन दिवस चोवीस तास टँकर चालणार आहेत़ मंगळवारची शक्यता असली तरी खात्री नसल्याचे सांगण्यात आले़मिरजेतून ज्या वारणेच्या पात्रातून म्हैसाळ योजनेतून लातूरसाठी पाणी उपसले जाते तेथील पाणी संपले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिका अडचणीत आली आहे़ शनिवारी ५० वॅगन भरुन उशिरा जलपरी आल्याने रविवारचा दिवस पाणी वितरणात कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही़ दरम्यान वारणा नदीच्या पात्रात म्हैसाळ योजनेतून लातूरला पाणी देण्यासाठी आता वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी सोमवारी दुपारपर्यंत तरी पोहचले नव्हते़ त्यामुळे रविवार व सोमवार दोन दिवस जलपरी आली नाही़ मंगळवारी सकाळी पाणी पोहचले तर उशिरा का होईना जलपरी लातुरात येणार आहे़ अन्यथा तिसऱ्या दिवशीही मनपा प्रशासनाला पाण्यासाठी स्थानिक स्त्रोतातून अधिक उपसा करावा लागणार आहे़ दोन दिवस जलपरी आली नसल्याने जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़ अचानक तूट निर्माण झाल्याने मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी रविवारी २४ तास टँकर चालविण्याचे आदेश बजावले़ त्यानुसार डोंगरगाव व बेलकुंड येथून ३०० टँकर पाणी आणण्यात आले आहे़ परिणामी, पाणी वितरणात फारसा परिणाम झाला नसला तरी मनपाकडे ठेवण्यात आलेले राखीव ५ ते १० लाख लिटर पाणी आता संपले आहे़ मंगळवारी जलपरी न आल्यास मात्र काहीसा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगरगाव, बेलकुंडच्या फेऱ्या वाढल्या...लातूर शहराला डोंगरगावातून दररोज १५ लाख लिटर आणि माकणी धरणातून दररोज ३५ लाख लिटर पाणी उचलले जाते. रेल्वेचे पाणी बंद झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे़ एरवी २०० ते २२५ टँकरच्या फेऱ्या होत होत्या, रेल्वेचे पाणी बंद झाल्याने ३०० फेऱ्या करण्यात आल्या आहेत़ यातून १० ते १२ लाख लिटर पाणी अधिक घेतले आहे़ शनिवारी उशिरा आलेल्या जलपरीचे पाणी रविवारी वितरण करण्यात आले़ सोमवारी स्थानिक स्त्रोतातून पाण्याचे संकलन वाढविण्यात आले असले तरी २५ लाख लिटरची तूट भरून काढणे शक्य नसल्याने मनपा अडचणीत सापडली आहे़ मंगळवारी प्रशासनाची धावपळ होणार आहे़ आता शिल्लक साठा नाही : आयुक्त सुधाकर तेलंगमिरजहून दोन दिवसांपासून जलपरी आली नाही़ परिणामी, ५० लाख लिटर पाणी कमी झाले आहे़ शनिवारी सायंकाळी जलपरी आल्याने रविवारी पाणी वितरणात अडचण निर्माण झाली नाही़ सोमवारीही रेल्वे येणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगरगाव व बेलकुंड येथून दररोज २०० ते २२० फेऱ्या व्हायच्या़ रविवारी टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने ३०० फेऱ्या झाल्या आहेत़ २४ तास टँकरने पाणी घेण्यात आले असून जवळपास १२ लाख लिटर पाणी अधिक आले आहे़ मंगळवारी रेल्वे येऊ शकते, जर आलीच नाही तर काही प्रमाणात शहरात तुटवडा निर्माण होईल़ बुधवारी मात्र रेल्वे येणार असून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़