शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीच्या तीन फेऱ्या झाल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:47 IST

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़ आवक कमी आणि जावक अधिक असल्याने मनपा प्रशासन अडचणीत सापडले आहे़ रविवार व सोमवारी जलपरी आली नसल्याने मनपा प्रशासनाने डोंगरगाव, बेलकुंड येथून टँकरद्वारे जवळपास १२ लाख लिटर पाणी जास्त आणले आहे़ दोन दिवस चोवीस तास टँकर चालणार आहेत़ मंगळवारची शक्यता असली तरी खात्री नसल्याचे सांगण्यात आले़मिरजेतून ज्या वारणेच्या पात्रातून म्हैसाळ योजनेतून लातूरसाठी पाणी उपसले जाते तेथील पाणी संपले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिका अडचणीत आली आहे़ शनिवारी ५० वॅगन भरुन उशिरा जलपरी आल्याने रविवारचा दिवस पाणी वितरणात कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही़ दरम्यान वारणा नदीच्या पात्रात म्हैसाळ योजनेतून लातूरला पाणी देण्यासाठी आता वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी सोमवारी दुपारपर्यंत तरी पोहचले नव्हते़ त्यामुळे रविवार व सोमवार दोन दिवस जलपरी आली नाही़ मंगळवारी सकाळी पाणी पोहचले तर उशिरा का होईना जलपरी लातुरात येणार आहे़ अन्यथा तिसऱ्या दिवशीही मनपा प्रशासनाला पाण्यासाठी स्थानिक स्त्रोतातून अधिक उपसा करावा लागणार आहे़ दोन दिवस जलपरी आली नसल्याने जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़ अचानक तूट निर्माण झाल्याने मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी रविवारी २४ तास टँकर चालविण्याचे आदेश बजावले़ त्यानुसार डोंगरगाव व बेलकुंड येथून ३०० टँकर पाणी आणण्यात आले आहे़ परिणामी, पाणी वितरणात फारसा परिणाम झाला नसला तरी मनपाकडे ठेवण्यात आलेले राखीव ५ ते १० लाख लिटर पाणी आता संपले आहे़ मंगळवारी जलपरी न आल्यास मात्र काहीसा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगरगाव, बेलकुंडच्या फेऱ्या वाढल्या...लातूर शहराला डोंगरगावातून दररोज १५ लाख लिटर आणि माकणी धरणातून दररोज ३५ लाख लिटर पाणी उचलले जाते. रेल्वेचे पाणी बंद झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे़ एरवी २०० ते २२५ टँकरच्या फेऱ्या होत होत्या, रेल्वेचे पाणी बंद झाल्याने ३०० फेऱ्या करण्यात आल्या आहेत़ यातून १० ते १२ लाख लिटर पाणी अधिक घेतले आहे़ शनिवारी उशिरा आलेल्या जलपरीचे पाणी रविवारी वितरण करण्यात आले़ सोमवारी स्थानिक स्त्रोतातून पाण्याचे संकलन वाढविण्यात आले असले तरी २५ लाख लिटरची तूट भरून काढणे शक्य नसल्याने मनपा अडचणीत सापडली आहे़ मंगळवारी प्रशासनाची धावपळ होणार आहे़ आता शिल्लक साठा नाही : आयुक्त सुधाकर तेलंगमिरजहून दोन दिवसांपासून जलपरी आली नाही़ परिणामी, ५० लाख लिटर पाणी कमी झाले आहे़ शनिवारी सायंकाळी जलपरी आल्याने रविवारी पाणी वितरणात अडचण निर्माण झाली नाही़ सोमवारीही रेल्वे येणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगरगाव व बेलकुंड येथून दररोज २०० ते २२० फेऱ्या व्हायच्या़ रविवारी टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने ३०० फेऱ्या झाल्या आहेत़ २४ तास टँकरने पाणी घेण्यात आले असून जवळपास १२ लाख लिटर पाणी अधिक आले आहे़ मंगळवारी रेल्वे येऊ शकते, जर आलीच नाही तर काही प्रमाणात शहरात तुटवडा निर्माण होईल़ बुधवारी मात्र रेल्वे येणार असून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़