शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

तरुणाचा खून करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : डोळे वटारून पाहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात समीर खान सिकंदर खान (२८, रा. आसेफिया कॉलनी) ...

औरंगाबाद : डोळे वटारून पाहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात समीर खान सिकंदर खान (२८, रा. आसेफिया कॉलनी) याचा चाकू भोसकून खून करून तीन संशयित आरोपी घरी जाऊन झोपले होते. या मारेकऱ्यांची ओळख पटताच शुक्रवारी पहाटे वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चिराग राजपाल बिडलॉन (रा. गांधीनगर) आणि दोन अल्पवयीन मुलांचा (विधि संघर्षग्रस्त बालक) यात समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी अजबनगर परिसरात श्वानाला दुचाकीला बांधून फरपटत नेल्याच्या आरोपावरून क्रांती चौक पोलिसांनी चिरागला अटक केली होती.

समीर खान आणि त्याचा मित्र मोहम्मद आदिल मोहम्मद आरेफ (२८,रा. चिश्तिया कॉलनी) हे बुलेटने टाऊन हॉल येथून बिअर पिण्यासाठी पिया मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा तेथे चिराग बिडलॉन त्याच्या दोन साथीदारांसह उभा होता. यावेळी डोळे वटारून काय पाहतो, असे म्हणून चिरागसोबतच्या एकाने समीरला शिवीगाळ केली. समीरचा मित्र मोहम्मद आदिल त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्याच्या कानाखाली मारून बाजूला लोटले. समीर पुढे येताच आरोपींनी समीरला पकडून मांडीत चाकू खुपसून त्याचा खून केला. अवघ्या ४० ते ५० सेकंदात समीरचा खून करून आरोपी मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून पळून गेले होते. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे आदिलच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

चौकट

अवघ्या सहा तासांत संशयित पकडले

गांधीनगरच्या तरुणांनी हा खून केल्याची माहिती उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांना मिळाली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि आरोपींनी वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून गाडीमालकापर्यंत पोलीस पोहोचले. तेव्हा त्यांनी दुचाकी विकल्याचे मात्र अद्याप दुचाकी त्यांच्याच नावे असल्याचे सांगितले. खरेदीदाराला गाठले असता त्यानेही दुचाकी गांधीनगरातील मित्राला वापरण्यास दिल्याचे सांगितले आणि त्याचे घर दाखवले. पोलीस आरोपीच्या घरी गेले तेव्हा तो गाढ झोपेत होता. अन्य दोन आरोपींनाही पोलिसांनी झोपेतून उठवून ताब्यात घेतले.

======================

समीरविरुद्ध १५ गुन्हे, तडीपार

मयत समीर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध गांजा विक्रीचे दोन गुन्हे, विनयभंग करणे, अपहरण करणे, घरात घुसून मारहाण करणे, शस्राने दुखापत करणे, धनादेश अनादर करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये त्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी तडीपार केले होते. २०१९ मध्ये शस्राने मारहाणीचा गुन्हा त्याच्यावर बेगमपुरा ठाण्यात दाखल झाला होता.