शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

घाटीच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोर पायऱ्यावर तासन्‌तास पडून असलेल्या एका जखमीचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ...

औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोर पायऱ्यावर तासन्‌तास पडून असलेल्या एका जखमीचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेविषयी बुधवारी सर्व स्तरातून एकच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत घाटी प्रशासनाने ३ सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली आहे.

पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली. या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने १७ मार्च रोजी ‘जखमेला मुंग्या...त्याने घाटीच्या पायऱ्यावर सोडला श्वास’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. सामाजिक संस्थांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती जेव्हा जखमी अवस्थेत पडून होती, त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी आता कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदन

अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) नागराज गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

फोटो ओळ....

अपघात विभागासमोर ज्या ठिकाणी त्या व्यक्तीने अखेरचा श्वास सोडला, त्या ठिकाणी बुधवारी अशाप्रकारे स्ट्रेचर ठेवण्यात आले होते.