शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:12 IST

शिरीष शिंदे ल्ल बीड मान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे.

आढावा बैठक : एप्रिल अखेरपासून कर्ज वाटपास सुरुवात; ३ टक्के वाटप पूर्णशिरीष शिंदे ल्ल बीडमान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १ हजार ७५० कोटी रुपये पीक कर्ज देण्यात येणार असून या संदर्भात दर आठवड्यास आढावा बैठक घेण्यात येत आहे. १० एप्रिलपर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ५७२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. यासह इतर नव्या पन्नास हजार शेतकऱ्यांचा यादीत समावेश झाल्याने तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होणार आहे. दरम्यान, खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अडचणी आल्यास त्याची दखल थेट जिल्हाधिकारी घेत आहेत. ७ हजार १२५ शेतकरी नुतणीकरण म्हणजेच जुनं-नव पीक कर्ज करतील. त्यांना ३६ कोटी ६२ लाख रुपये कर्ज या पद्धतीने वाटप होईल. ९ हजार ६३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ११ लाख पीक कर्ज देण्यात येणार आहे. मागच्यावर्षी जिल्ह्यातील २०२ बँक शाखांनी २ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना पीक र्ज वाटप केले होते. यंदा त्यात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ आहे. बँकांना ८० टक्के पीक विमा वाटपाचे उद्दिष्टमंगळवारी पीक कर्ज आढावा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे, कृषी अधीक्षक रमेश भताने, एसबीएचचे पत्की यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते. बँकांच्या पीक कर्जासंदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जिल्ह्यात ८ लाख शेतकरी असून यावर्षी ८० टक्के पीक विमा वाटप झाला पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.बँक अधिकाऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जात आहे. आतापर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून त्यात पुढील महिन्यात वाढ होईल. -गंगाधर बोकाडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी