शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यात विविध अपघातांत तिघे ठार

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून

उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून, संबंधित पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डोमगाव येथील अतुल विक्रम नलवडे (वय-२४ ह़मु़बार्शी) हे गुरूवारी दुपारी बार्शी येथून कारमधून परंडा मार्गे सालसे (ताक़रमाळा)कडे निघाले होते़ त्यांची कार परंड्यानजीकच्या बुस्टरजवळ आली असता समोरून आलेल्या मालट्रकने (क्रक़े़ए़३२- ५९८६) जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अतुल नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर ट्रकचालक मोहंमद खान याने वैराग पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली़ अपघाताचे क्षेत्र वैराग हद्दीत येत असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़वाशी तालुक्यातील पारगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी दुपारी सोलापूरहून कापूस घेवून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकने (क्ऱएम़एच़२०- ए़टी़५९७५) एका ३८ वर्षीय इसमाला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला़ मात्र, एक ते दीड तासांनी पोलीस घटनास्थळी आल्यावर त्याचे पार्थिव पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़ याबाबत पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात ट्रकचालक आनंदा माणिकराव वाघ (रा़वरूड ता़भोकरदन जि़जालना) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, मयत इसमाजवळील मोबाईलद्वारे त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, त्याचे नाव शरद काशीनाथ सूर्यवंशी (रा़सुरपान ता़साखरी जि़धुळे) असे असल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)