शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वडगावजवळ अपघातात तिघे ठार

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : कंटेनर आणि टमटमच्या भीषण अपघातात तिघे जण ठार तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत

उस्मानाबाद : कंटेनर आणि टमटमच्या भीषण अपघातात तिघे जण ठार तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव सिद्धेश्वर (ता. उस्मानाबाद) नजीक घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद-सोलापूर मार्गावरून भरधाव वेगातील कंटेनर (एमएच. ४६- एच. ७८७८) तुळजापूरकडे निघाला होता. तर प्रवासी वाहतूक करणारे टमटम (एम.एच. २५/एफ.१५७७) प्रवासी घेवून तुळजापूरहून उस्मानाबादकडे येत होते. ही दोन्ही वाहने वडगाव (सि) नजीक आली असता भरधाव वेगातील कंटेनरने टमटमला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टमटमधील चंद्रकला सिद्धलिंग केवटे (वय-४८, रा. ढेकरी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आनिता मुरली मार्तंड (वय-५०, रा. बामणीवाडी) व टमटमचालक उद्देश भाऊसाहेब राठोड (वय-२८, रा. दीपक तांडा) या दोघांना उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या अपघातात बंडू आगातराव खंडागळे (वय-३८, रा. जुनोनी), अर्चना नानासाहेब सिरसट (वय-३५, रा. बोरी), सुभाष हरी बनसोडे (वय-३५, रा. लासोना), ज्योती नाना सिरसट (वय-१७, रा. बोरी), सुवर्णा पोपट लगदिवे (वय-५०, रा. शेकापूर) आणि निर्मला शिवाजी लगदिवे (वय-५०, रा. शेकापूर) हे सहाजणही जखमी झाले. यापैकी ज्योती सिरसट व सुवर्णा लगदिवे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयामध्ये प्रथमोपचार करून त्यांना तातडीने सोलापूर येथे हलविण्यात आले. या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांची लांबलचक रांग लागली होती. जखमींना रूग्णालयात हलविल्यांनतर क्रेनच्या साह्याने कंटेनर रस्त्यावरून हटविण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी डीवायएसपी मोहन विधाते, पोउपनि सूर्यवंशी, राठोड आदी दाखल झाले होते. (प्रतिनिधी) तुळजापूर : सोलापूर-धुळे महामार्गावरील माळुंब्रा गावानजीक टँकर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.तुळजापूर तालुक्यातील दहीवडी येथील सुखदेव राघु गायकवाड (वय-२०) आणि नितीन तानाजी गायकवाड (वय-१५) हे दोघेही दुचाकीवरून (क्र. एमएच. २५- एक्स. ५५६०) तुळजापूरकडे निघाले होते. यांची दुचाकी माळुंब्रा गावानजीक असलेल्या नागोबा मंदिराजवळ आली असता पाठीमागून येणाऱ्या टँकरने (क्र. एमएच.२४-जे.८४३२) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाले. या प्रकरणी बळी रामू गायकवाड (रा. दहीवाडी) यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरूद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)