शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे तीन तेरा

By admin | Updated: May 14, 2014 23:58 IST

जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत आहे.

जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत असून, काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात चक्क १५- १५ दिवसाआड पुरवठा होत असल्याने पाणी असून शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना शहराला घाणेवाडी व जायकवाडी- जालना योजनेतून पाणीपुरवठा होतो. घाणेवाडीतून नवीन जालन्याला तर जायकवाडी योजनेतून जुन्या जालन्याला पाणीपुरवठा होतो आहे. या दोन्हीही स्त्रोत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. दुर्दैवाने पालिका प्रशासनाकडून तेथून पाणी आणण्यासह ते वितरीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. मुळात शहरात पाणीपुरवठ्याबाबत पालिकेने कुठलेही नियोजन केले नाही. पालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्याधिकार्‍यांसह सभापती या संदर्भात कमालीचे मौन बाळगून आहेत. परिणामी, संपूर्ण शहरवासीय पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. शहरातील विविध भागांना पाणी सोडण्याचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कोणत्याही भागाला केव्हाही पाणीपुरवठा केला जातो. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी सोडले जात आहे. त्याप्रमाणे काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात पंधरा-पंधरा दिवसांनी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी योजनेमुळे गेल्यावर्षीएवढी भीषण टंचाई जाणवत नाही. मात्र पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. जुन्या जालना भागात मागील १० ते १५ दिवसांपासून निर्जळी होती. बुधवारी या भागात पाणीपुरवठा झाला. नवीन जालना भागात काही ठिकाणी दहा-दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तेथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत किंवा पाणी टँकरव्दारे खरेदी करत आहेत. पाणी सोडताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव करण्यात येत असल्याचे चित्र काही भागात पहावयास मिळत आहे. शहरातील काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी दोन-दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कमीवेळ पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याइतकेही पाणी मिळत नाही तर जास्त वेळ पाणी आलेल्या भागात नागरिकांना मुबलक पाणी मिळून ते वायाही जात असल्याचे चित्र दिसते. त्यापाण्यातून वाहनेही धुतल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. (वार्ताहर) वेळापत्रक नसल्याची कबुली पालिकेकडे पाणीपुरवठ्यासंबधी वेळापत्रक नसल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनीही कबूल केले आहे. एकदा वेळापत्रक तयार केले होते. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा करताना भारनियमनाचा मोठा अडथळा येत होता. त्यामुळे भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे विविध भागात आठ दिवसाआड ठराविक वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याचे पालिकेच्य पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.