शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे तीन तेरा

By admin | Updated: May 14, 2014 23:58 IST

जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत आहे.

जालना: नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत कसलेही वेळापत्रक तयार केले नाही. त्यामुळे जुन्या व नवीन जालन्यातील वसाहतींमधून वेळी-अवेळी केव्हाही पाणीपुरवठा होत असून, काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात चक्क १५- १५ दिवसाआड पुरवठा होत असल्याने पाणी असून शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना शहराला घाणेवाडी व जायकवाडी- जालना योजनेतून पाणीपुरवठा होतो. घाणेवाडीतून नवीन जालन्याला तर जायकवाडी योजनेतून जुन्या जालन्याला पाणीपुरवठा होतो आहे. या दोन्हीही स्त्रोत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. दुर्दैवाने पालिका प्रशासनाकडून तेथून पाणी आणण्यासह ते वितरीत करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. मुळात शहरात पाणीपुरवठ्याबाबत पालिकेने कुठलेही नियोजन केले नाही. पालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्याधिकार्‍यांसह सभापती या संदर्भात कमालीचे मौन बाळगून आहेत. परिणामी, संपूर्ण शहरवासीय पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. शहरातील विविध भागांना पाणी सोडण्याचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कोणत्याही भागाला केव्हाही पाणीपुरवठा केला जातो. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी सोडले जात आहे. त्याप्रमाणे काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात पंधरा-पंधरा दिवसांनी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी योजनेमुळे गेल्यावर्षीएवढी भीषण टंचाई जाणवत नाही. मात्र पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. जुन्या जालना भागात मागील १० ते १५ दिवसांपासून निर्जळी होती. बुधवारी या भागात पाणीपुरवठा झाला. नवीन जालना भागात काही ठिकाणी दहा-दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तेथील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत किंवा पाणी टँकरव्दारे खरेदी करत आहेत. पाणी सोडताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव करण्यात येत असल्याचे चित्र काही भागात पहावयास मिळत आहे. शहरातील काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी दोन-दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कमीवेळ पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याइतकेही पाणी मिळत नाही तर जास्त वेळ पाणी आलेल्या भागात नागरिकांना मुबलक पाणी मिळून ते वायाही जात असल्याचे चित्र दिसते. त्यापाण्यातून वाहनेही धुतल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. (वार्ताहर) वेळापत्रक नसल्याची कबुली पालिकेकडे पाणीपुरवठ्यासंबधी वेळापत्रक नसल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनीही कबूल केले आहे. एकदा वेळापत्रक तयार केले होते. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा करताना भारनियमनाचा मोठा अडथळा येत होता. त्यामुळे भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे विविध भागात आठ दिवसाआड ठराविक वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याचे पालिकेच्य पाणी पुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.