शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तीन दिवसांआड पाणी; औरंगाबादेत काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:24 IST

किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यात दुरुस्ती : मनपा प्रशासनाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.आझाद चौकापासून रोशनगेटपर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिक राहतात. मागील अनेक महिन्यांपासून या भागातील नागरिकांना सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. त्यात महापालिकेची जलवाहिनी फुटल्यास नागरिकांना दोन आठवडे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या या दु:खाकडे संबंधित लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीम भय्या पटेल यांनी बुधवारी सकाळी मनपासमोर लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मनपा प्रशासनाने विनंती केली की, आंदोलन करू नका पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येईल. नियोजित कार्यक्रमानुसार आंदोलन सुरू करण्यात आले. पाच वॉर्डांतील असंंख्य नागरिक, महिला उपस्थित होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, तकी हसन खान, गटनेते भाऊसाहेब जगताप, पवन डोंगरे, मीर हिदायत अली, युसूफ शेख, रमजानी खान, तय्यब पटेल, सिराजभाई, नईम शेख, अली बाबा, इरफानभाई, मालोदे, अजहर खान, खालेद पठाण, लुखमान हाजी, मुख्तार पटेल, रफिक पटेल, शेख मेहराज, शफी मौलाना आदींची उपस्थिती होती.नागरिकांना दिलासा देणारआझाद चौक ते रोशनगेटपर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न, लिकेज आणि तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता पद्मे यांनी आंदोलकांना दिले. या भागातील नागरिकांना तूर्त दिलासा देण्याचे प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे यावेळी अधिकाºयांनी सांगितले.महापौर करणार पाहणीकाँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महापौरांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. प्रशासनालाही पाणी प्रश्नावर सूचना दिल्या. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.