शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

शहराला तीन दिवस निर्जळी

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत

औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत असून, ३ ते ५ जूनपर्यंत पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे की, २२ मेपासून पाणीपुरवठा योजनेवरील पंपगृहास होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी २ जून रोजी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. त्यामध्ये ढोरकीन पंपगृहासाठी एक्स्प्रेस फिडरची जोडणी करण्याचा निर्णय झाला. इतर पंपगृहांना अखंड वीज देण्याचे महावितरणने मान्य केले. २ जूननंतर पुन्हा लपंडाव वीजपुरवठा सुरळीत करण्याचे ठरलेले असताना महावितरणने २ जूनपासून पुन्हा विजेचा लपंडाव सुरू केला. २ जून रोजी ढोरकीन पंपगृहाचा वीजपुरवठा रात्री ८.४५ वा. खंडित झाला. त्यामुळे ३ जून रोजी शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. ३ जून रोजी सकाळी ९.३५ वा. सुरळीत करण्यात आला. ३ जून रोजी दुपारी ३.३५ वा. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तो वीजपुरवठा ४ जूनपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. परिणामी बुधवारी आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. वीजपुरवठा सुरुळीत झाल्यास शहराला येत्या तीन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल. अन्यथा होणार नाही, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले आहे.