शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

शहराला तीन दिवस निर्जळी

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत

औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत असून, ३ ते ५ जूनपर्यंत पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे की, २२ मेपासून पाणीपुरवठा योजनेवरील पंपगृहास होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी २ जून रोजी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. त्यामध्ये ढोरकीन पंपगृहासाठी एक्स्प्रेस फिडरची जोडणी करण्याचा निर्णय झाला. इतर पंपगृहांना अखंड वीज देण्याचे महावितरणने मान्य केले. २ जूननंतर पुन्हा लपंडाव वीजपुरवठा सुरळीत करण्याचे ठरलेले असताना महावितरणने २ जूनपासून पुन्हा विजेचा लपंडाव सुरू केला. २ जून रोजी ढोरकीन पंपगृहाचा वीजपुरवठा रात्री ८.४५ वा. खंडित झाला. त्यामुळे ३ जून रोजी शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. ३ जून रोजी सकाळी ९.३५ वा. सुरळीत करण्यात आला. ३ जून रोजी दुपारी ३.३५ वा. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तो वीजपुरवठा ४ जूनपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. परिणामी बुधवारी आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. वीजपुरवठा सुरुळीत झाल्यास शहराला येत्या तीन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल. अन्यथा होणार नाही, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले आहे.