शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सख्ख्या भावासह तिघांना दहीपुरीतून अटक

By admin | Updated: September 8, 2014 00:51 IST

रवी गात , अंबड सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंबड-औरंगाबाद मार्गावर किनगाव चौफुलीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह जाळल्याच्या घटनेचा उलगडा करण्यात गोंदी पोलिसांना अखेर यश आले आहे

रवी गात , अंबडसुमारे दोन महिन्यांपूर्वी अंबड-औरंगाबाद मार्गावर किनगाव चौफुलीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह जाळल्याच्या घटनेचा उलगडा करण्यात गोंदी पोलिसांना अखेर यश आले आहे. मागील दोन महिन्यांपासून मयताची ओळख पटत नसताना पोलीसांनी ही अवघड कामगिरी पार पाडली आहे.या प्रकरणी मयत विष्णू किसन नरवडे यांच्या सख्ख्या भावासह तीन जणांना शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेतले. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मागील दोन महिन्यापासुन कोणताही सुगावा लागत नसताना व मयताची ओळख पटत नसताना पोलीसांनी ही अवघड कामगिरी पार पाडल्याबद्दल सर्वत्र पोलीसांचे कौतुक होत आहे.पाच दिवसांपूर्वी तीर्थपुरीजवळ बँकेची कॅश लुटण्यात आली. या दरोड्याचा तपास लावण्याचे आवाहन गोंदी पोलीसांसमोर होते. दरोड्याच्या तपासासाठी पोलीसांनी सर्वत्र आपले खबऱ्यांचे जाळे पसरविले. त्याचवेळी पोलिसांना एका खुनाचा सुगावा लागला. पोलिसांनी सुगावा लावताच दहीपुरी गावात वेषांतर करुन आपल्या पोलिसांना पाठविले. पाच-सहा दिवस गावात राहून पोलीसांनी संपूर्ण माहिती काढली. संपूर्ण माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, विष्णु चव्हाण, रामनाथ मुळक, ए. एस. सोनवणे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा दहीपुरी येथे छापा टाकून शरद किसन नरवडे या मुख्य आरोपीसह आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी धक्कादायक माहिती दिली.आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार दहीपुरी येथील रहिवासी विष्णू किसन नरवडे याचे दोन लग्न झाले होते. विष्णू यास दारुचे व इतर व्यसन होते. त्याचे पहिले लग्न तालुक्यातील बारसवाडा येथील मुलीशी झाले होते, मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला, यावेळी विष्णु हा काही काम करत नसल्याने त्याचा लहान भाऊ शरद याने घटस्फोटीत पत्नीस पोटगीसाठी ठरलेली रक्कम विष्णू यास दिली. यानंतर काही काळाने विष्णू याने घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील मुलीशी दुसरे लग्न केले. मात्र अवघ्या दीड महिन्यातच तिने सुध्दा विष्णुच्या वागणुकीस कंटाळून जाळून घेतले. यावेळीही विष्णूचा भाऊ शरद याने जळीत भावजयीच्या उपचारासाठी व इतर गोष्टींसाठी मोठा खर्च केला. मागील काही महिन्यांपासून विष्णूने पुन्हा एकदा आपल्याला लग्न करायचे असल्याचे घरी सांगितले.आधीच घडलेल्या दोन प्रकरणामुळे तसेच दारु व इतर व्यवसनामुळे शरद हा आपल्या भावाच्या वागणुकीस कंटाळला होता. विष्णूने स्वत:च्या लग्नासाठी तगादा लावताच शरद याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी त्याने आपल्या मित्रांची मदत घेण्याचेही ठरविल्याची माहिती पोलीसांनी दिली.सुमारे दोन महिन्यांपूर्वी शरद याने शेतात दाळबट्टीचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शरद याने आपला भाऊ विष्णू याच्यासह आपले मित्र राजू बाबुराव कनके (२०), रामदास तुकाराम नरवडे (१९), सुनील विठ्ठल नरवडे(२०) व राजू त्र्यबंक नरवडे(२२)(सर्व रा.दहीपुरी ता.अंबड) यानांही शेतात बोलावले. सर्वांनी एकत्र मद्यप्राशन केले. मद्यप्राशनानंतर शरद याने आपल्या मित्रांसह विष्णू याचा गळा आवळून तसेच तोडांत माती कोंबून खून केला. पऱ्हाटीच्या फासावर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नयानंतर शरद याच्या दुचाकीवर ( एम.एच.२१ ए.एल.४६३७) विष्णूचे प्रेत बसविले. त्याच्या पाठीमागे रामदास व राजू दोघे प्रेत धरुन बसले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास सर्वजण दुचाकीने दहीपुरी येथून अंबड जवळील महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात आले. तेथे त्यांनी एका दुकानासमोरुन सिमेंटची रिकामी गोणी घेतली. यानंतर सर्वजण प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठीच्या योग्य जागेच्या शोधात औरंगाबादला जाणाऱ्या मार्गाने निघाले. किनगांव चौफुली येथील वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला त्यांना कापसाचा फास दिसला. दुचाकीतुन पेट्रोल काढून प्रेत पेटवून दिले. प्रेत व्यवस्थित जळाल्याची खात्री करुन सर्वजण दहीपुरी येथे परतले. दुसऱ्या दिवशी शरदने आपला भाऊ विष्णू हा कामाच्या शोधात पुणे येथे गेल्याचे सर्वांना सांगितले.